शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठा भरपूर, तरी टंचाईच्या नावे निधीचा महापूर!

By किरण अग्रवाल | Updated: February 9, 2020 01:17 IST

जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता असूनही टंचाईच्या अनावश्यक उपाययोजना जिल्हा परिषदेकडून सुचविल्या गेल्याचे पाहता, यंत्रणांची झापडबंद कामकाजाची परिपाठी स्पष्ट व्हावी. चाकोरीबद्धतेतून बाहेर न पडता व संवेदनशीलतेने समस्येकडे न पाहता कर्तव्य बजावण्याच्या असल्या प्रकारांमुळेच जनतेच्या नाराजीचा सामना करण्याची वेळ ओढवते.

ठळक मुद्दे वास्तविकतेचा विचार न करताच आराखडे आखले जाणार असतील तर फेरनियोजनाची वेळ ओढावणारचटंचाईचे आभासी चित्र रेखाटून आराखडा करणाºया व कोट्यवधींचे आकडे फुगवणाऱ्यांचे हेतू तपासले जाणे गरजेचे आहे.अन्यथा पाणीटंचाईच्या नावाने भलत्यांचेच हात ओले होण्याची शक्यता नाकारता येऊ नये.

सारांश

रडल्याखेरीज अगर मागितल्याशिवाय मिळत नाही हे खरेच; पण म्हणून केवळ रडतच बसायचे किंवा अवास्तव मागण्या नोंदवायच्या असे नाही. सरकारी यंत्रणा मात्र मागच्या पानावरून पुढे सरकणाऱ्या असतात. वास्तवाशी मेळ न घालता त्या चालतात आणि म्हणून त्यांना अडखळण्याची वेळ येते. यातून कालापव्यय तर होतोच, शिवाय त्यामागील हेतंूबद्दल संशयही निर्माण होतो. जिल्ह्यात दुष्काळाची शक्यता नसताना जिल्हा परिषदेकडून केल्या गेलेल्या नियोजन व निधीच्या तरतुदींकडेही त्याचदृष्टीने पाहता यावे.

यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे धरणे तर भरलीच, विहिरींची व जमिनीतील जलपातळीही वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये चालू फेब्रुवारीपर्यंत ८५ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. शिवाय, अद्यापपर्यंत तरी कुठेही पाण्यासाठी टँकर लावावा लागल्याची वेळ ओढवलेली नाही. पाऊस भरपूर झाल्याने मराठवाड्यासाठीही भरपूर पाणी सोडले गेले. त्यामुळे जायकवाडीतही समाधानकारक साठा आहे. परिणामी नाशकातील धरणात जो साठा आहे तो सुरक्षित असल्याचे म्हणता यावे. एकूणच ही स्थिती यंदा पाणी तुटवडा किंवा दुष्काळ झळा जाणवू न देणारी आहे. या पाणीसाठ्यामुळेच यंदा जिल्ह्यातील टँकर्सची संख्या घटण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. पण असे असताना जिल्हा परिषदेने टंचाई आराखड्यात पाणीटंचाई गृहीत धरून वाढीव कामे सुचविली व त्यासाठी निधीही अपेक्षिला, त्यामुळे फेरनियोजन करून वास्तवदर्शी आराखडा करा, असे सांगण्याची व कपातीची वेळ आली. सरकारी यंत्रणांच्या ‘ये रे माझ्या मागल्या’ स्वरूपाचे कामकाज यानिमित्ताने पुन्हा पुढे येऊन जाणे स्वाभाविक ठरले.

मुळात, यंदा जिल्ह्यात पाणीसाठा मुबलक आहे व टंचाईची स्थिती नाही हे ढळढळीतपणे दिसत असतानाही जिल्हा परिषदेची यंत्रणा टँकर्ससह अन्य उपाययोजना व त्यासाठीच्या खर्चाचा आराखडा सादर करतेच कशी, हा यातील प्रश्न आहे. संबंधित अधिकारी प्रत्यक्ष ग्राउण्ड रिपोर्ट न घेता बसल्याजागी कागदाला कागद जोडून कारभार हाकतात, हे यातून स्पष्ट व्हावेच; परंतु पारंपरिकपणे परस्पर सामीलकीतून पोसली जाणारी टँकर लॉबी जपण्याचे प्रयत्न तर यामागे नसावेत ना, असा संशयही घेता यावा. मागे महेश झगडे जिल्हाधिकारीपदी असताना ‘लोकमत’नेच टँकर घोटाळा उघडकीस आणला होता. आठवड्यातून एक फेरी करून सात दिवसाच्या सह्या ठोकून बिले काढणारे ठेकेदार त्यातून उघडे पडले होते. त्यांना दंड आकारून काळ्या यादीत टाकले गेले होते. हे फक्त ठेकेदाराच्याच पातळीवर सुरू असणे शक्य नसते. यंत्रणांशी मिलिभगत त्यात असते. पण काळ पुढे सरकतो, तशा जुन्या गोष्टी व कारवाया मागे पडतात. नवीन ‘लॉबी’ नव्या दमाने पुढे येते. तेव्हा, पाणीसाठा असूनही टंचाईचे आभासी चित्र रेखाटून आराखडा करणाºया व कोट्यवधींचे आकडे फुगवणाऱ्यांचे हेतू तपासले जाणे गरजेचे आहे.

वस्तुस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचनेनंतर सुमारे नऊ कोटींची कपात करून अंतिमत: १३ कोटींचा टंचाई आराखडा आता केला गेला आहे. मांढरे यांनी वास्तवदर्शी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेला ही कपात करणे भाग पडले; पण यापुढे लोकप्रतिनिधींनीही आराखड्यानुसार कामे व उपाययोजना खरेच होत आहेत की नाही याकडे लक्ष पुरविणे अपेक्षित आहे, अन्यथा पाणीटंचाईच्या नावाने भलत्यांचेच हात ओले होण्याची शक्यता नाकारता येऊ नये. कारण आराखड्यातील फेरफार व दुरुस्ती ही नेहमीची बाब असली तरी, बहुतेकदा निधी व गरजेच्या अनुषंगाने ते बदल सुचविले जातात. यंदा गृहीतकच चुकीचे झाल्याने फेरनियोजन करण्याची वेळ आली त्यामुळे या अवास्तव आराखड्याकडे संशयाने पाहिले जाणे क्रमप्राप्त ठरले.

महत्त्वाचे म्हणजे, पाणीटंचाई आराखड्यात मुरू पाहणारे ‘पाणी’ रोखले गेले. पण शेतविहिरीत जे पाणी आहे ते वापरण्यासाठी आवश्यक असणाºया वीजपुरवठ्याचे काय, हा प्रश्नच आहे. पाणी असूनही टंचाईच्या झळा अनुभवण्याची वेळ यामुळे ओढवू शकते. विजेचे भारनियमन व नादुरुस्त रोहित्रे आदी कारणे त्यासाठी त्रासदायी ठरू शकणारी आहेत. तेव्हा, एकूणच टंचाई आराखड्याच्या उपायात्मक बाबींकडे प्रतिवर्षाचे आन्हीक म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही तर समस्येचे समाधान शोधण्याच्या मनोभूमिकेतून त्याकडे पाहावे लागेल, इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :Politicsराजकारणwater scarcityपाणी टंचाईnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार