शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

साहित्यकारणातील अर्थव्यवहार कोरोनाने उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 01:34 IST

कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादातून उमटला.

ठळक मुद्देउमटला सूर : विविध विचारवंत, तज्ज्ञांकडून मंथन

नाशिक : कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले

नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादातून उमटला.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी कुसुमाग्रजनगरीमध्ये शनिवारी (दि.४) कोरोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी

साहित्य व्यवहार या विषयावर विविध तज्ज्ञ व विचारवंतांनी एकत्र येत आपल्या विचारांद्वारे मंथन घडवून आणले. साहित्यिक तथा ज्येष्ठ

 

पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, डॉ. आशुतोष रारावीरकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश

भटेवरा, डॉ. हंसराज जाधव, अभिनेता व लेखक दीपक करंजीकर, सुरेश भटेवरा, राहुल रनाळकर यांनी सहभाग घेतला.

जगात १९३० मध्ये आर्थिक मंदी आली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी

देशाच्या चलनाबरोबर सोन्याच्या साठ्याचा समन्वय तोडण्यात आला. त्यामुळे

 

आगामी काळात सर्व देशांची सरकारे कर्जबाजारी झाली. चीनने संपूर्ण जगाची बाजारपेठ काबीज

केली आहे. मात्र आता कोरोनानंतर भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

टाकले आहे, असे विनायक गोविलकर यावेळी म्हणाले. कोरोना काळात अर्थशास्त्राचे महत्त्व वाढले आहे. अर्थकारण उत्पादन,

तंत्रज्ञान, वितरण या तीन गोष्टीभोवती फिरत असते. कोविड काळात आधुनिक

 

तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्याचे आशुतोष रारावीरकर म्हणाले. २०१४ सालापासून देशाचे अर्थकारण बिघडले. नोटबंदी आणि जीएसटीचा मोठा झटका

सहन करताना त्यामधून अर्थव्यवस्था सावरत नाही तोच कोरोनाची आपत्ती आली. या काळात नोकरदार, उद्योजक, गृहिणी,

शेतकरी, कामगार असे सर्वच वर्ग त्रस्त आणि निराश आहेत. नोटबंदीसाठी

सांगितलेली सर्वच कारणे फोल ठरल्याने हा निर्णय सपशेल फसला. काळा पैसा

 

देशात आणायचा सोडून अनेकजण कर्ज काढून देश सोडून पळाल्याची टीका पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केली. ---

 

-इन्फो---

कोरोनाचे उद्ध्वस्तीकरण साहित्यातही...!

देशात बेकारी, द्रारिद्र्य, महागाई, विषमता वाढली हे खरेच आहे. कोरोनाने

केलेल्या उद्ध्वस्तीकरण आता साहित्यात उतरू लागले आहे. जगायचे कसे हा

प्रश्न असतानाच साहित्य निर्मिती आणि वाचन हा दुय्यम भाग झाला आहे. लेखन

 

आणि वाचन या एकांतात चालणाऱ्या गोष्टी आहेत. कातडीबचावपणा

साहित्यनिर्मिती करू शकत नाही. कोरोनानंतर माणसाचा शोध

सुरू असून अर्थकारण चाचपडत आहे. माणसं पुन्हा एकत्र येण्यासाठी

 

साहित्याची गरज असून संवाद प्रक्रिया वाढायला हवी, असे मत जयदेव डोळे यांनी यावेळी मांडले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकcorona virusकोरोना वायरस बातम्या