शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

साहित्यकारणातील अर्थव्यवहार कोरोनाने उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 01:34 IST

कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादातून उमटला.

ठळक मुद्देउमटला सूर : विविध विचारवंत, तज्ज्ञांकडून मंथन

नाशिक : कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले

नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादातून उमटला.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी कुसुमाग्रजनगरीमध्ये शनिवारी (दि.४) कोरोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी

साहित्य व्यवहार या विषयावर विविध तज्ज्ञ व विचारवंतांनी एकत्र येत आपल्या विचारांद्वारे मंथन घडवून आणले. साहित्यिक तथा ज्येष्ठ

 

पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, डॉ. आशुतोष रारावीरकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश

भटेवरा, डॉ. हंसराज जाधव, अभिनेता व लेखक दीपक करंजीकर, सुरेश भटेवरा, राहुल रनाळकर यांनी सहभाग घेतला.

जगात १९३० मध्ये आर्थिक मंदी आली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी

देशाच्या चलनाबरोबर सोन्याच्या साठ्याचा समन्वय तोडण्यात आला. त्यामुळे

 

आगामी काळात सर्व देशांची सरकारे कर्जबाजारी झाली. चीनने संपूर्ण जगाची बाजारपेठ काबीज

केली आहे. मात्र आता कोरोनानंतर भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

टाकले आहे, असे विनायक गोविलकर यावेळी म्हणाले. कोरोना काळात अर्थशास्त्राचे महत्त्व वाढले आहे. अर्थकारण उत्पादन,

तंत्रज्ञान, वितरण या तीन गोष्टीभोवती फिरत असते. कोविड काळात आधुनिक

 

तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्याचे आशुतोष रारावीरकर म्हणाले. २०१४ सालापासून देशाचे अर्थकारण बिघडले. नोटबंदी आणि जीएसटीचा मोठा झटका

सहन करताना त्यामधून अर्थव्यवस्था सावरत नाही तोच कोरोनाची आपत्ती आली. या काळात नोकरदार, उद्योजक, गृहिणी,

शेतकरी, कामगार असे सर्वच वर्ग त्रस्त आणि निराश आहेत. नोटबंदीसाठी

सांगितलेली सर्वच कारणे फोल ठरल्याने हा निर्णय सपशेल फसला. काळा पैसा

 

देशात आणायचा सोडून अनेकजण कर्ज काढून देश सोडून पळाल्याची टीका पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केली. ---

 

-इन्फो---

कोरोनाचे उद्ध्वस्तीकरण साहित्यातही...!

देशात बेकारी, द्रारिद्र्य, महागाई, विषमता वाढली हे खरेच आहे. कोरोनाने

केलेल्या उद्ध्वस्तीकरण आता साहित्यात उतरू लागले आहे. जगायचे कसे हा

प्रश्न असतानाच साहित्य निर्मिती आणि वाचन हा दुय्यम भाग झाला आहे. लेखन

 

आणि वाचन या एकांतात चालणाऱ्या गोष्टी आहेत. कातडीबचावपणा

साहित्यनिर्मिती करू शकत नाही. कोरोनानंतर माणसाचा शोध

सुरू असून अर्थकारण चाचपडत आहे. माणसं पुन्हा एकत्र येण्यासाठी

 

साहित्याची गरज असून संवाद प्रक्रिया वाढायला हवी, असे मत जयदेव डोळे यांनी यावेळी मांडले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकcorona virusकोरोना वायरस बातम्या