शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी येथे इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा फेस्टिव्हलचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:54 IST

दिंडोरी : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दिमाखात झाला.

ठळक मुद्देवाइन फेस्टिव्हलची संकल्पना विशदशेतमालाचे विपणन थेट ग्राहकांपर्यंत

दिंडोरी : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दिमाखात झाला. सदर महोत्सवानिमित्त ११ मार्चपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवार, शनिवार व रविवार विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, माजी आमदार माणिकराव कोकाटे, सह्याद्रीचे विलासराव शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील, कैलास भोसले, रवींद्र बोराडे, जगन खापरे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, प्रवीण जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक करताना फेस्टिव्हलचे आयोजक जगदीश होळकर यांनी वाइन फेस्टिव्हलची संकल्पना विशद केली. यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतमालाचे विपणन थेट ग्राहकांपर्यंत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जगभरात द्राक्षामुळे नाशिकची नवी ओळख निर्माण झाली आहे. ग्रेप फेस्टच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटनास चालना मिळणार आहे. सह्याद्रीने शेतकºयांना एकत्रित करत त्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक शेतमालासाठी इंडस्ट्री उभी करण्याची गरज असल्याचे सह्याद्रीचे विलास शिंदे यांनी सांगितले. पर्यटन विकास महामंडळाचे आशुतोष राठोड यांनी बोलताना सह्याद्री फार्मने शेतकरी व ग्राहक दोघांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, सह्याद्री हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असून, त्यास अधिकृत पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा देत विकसित करण्याचे आश्वासन यावेळी राठोड यांनी दिले. यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी विलास शिंदे यांनी उभारलेल्या या कामाला सलाम करत भविष्यात शासन त्यांच्या या कामासाठी नक्कीच मदत करेल, असे आश्वासन दिले.इंडिया ग्रेप फेस्टचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार होता; मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित होते, हा धागा पकडत आपल्या भाषणात आमदार अनिल कदम यांनी शेतकºयांसाठी होत असलेला हा कार्यक्रम असून, त्यांनी यायलाच हवे होते असे सांगितले. यानंतर उत्सव सह्याद्रीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.