शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

गोदावरीत लेंडी नाल्याचे दूषित पाणी; आरोग्य धोक्यात : महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:02 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून हा नाला बंदिस्त नसल्याने नाल्यातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत

नाशिक : गोदापार्क परिसरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याचे पाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत असून, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्याचे पाणी नदीपात्रात मिसळत असले तरी प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून हा नाला बंदिस्त नसल्याने नाल्यातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्रात मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी थांबवायची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांनी केला आहे. नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी पुढे रामकुंड, सीताकुंडात मिसळत असल्याने स्नानासाठी येणा-या भाविकांना याच पाण्यात स्नान करावे लागते परिणामी नागरिकांचे आरोग्य या नदीपात्रात मिसळणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.एकीकडे महापालिका प्रशासन नदीपात्राची साफसफाई करून प्रदूषण होणार नाही याची दखल घेत असले तरी दुसरीकडे मात्र थेट नाल्यातील पाणी नदीपात्रात मिसळत असताना त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.

 

टॅग्स :riverनदीNashikनाशिक