शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

ग्रामपालिका उमेदवारी अर्जासाठी उद्या अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 3:43 PM

कळवण तालुका : जातवैधतेशिवाय लढता येणार निवडणूक 

ठळक मुद्देउमेदवाराला निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

कळवण : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता जातवैधता प्रमाणपत्राशिवाय उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आयोगाने वाढविली असून, येत्या १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.राखीव जागांसाठी उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते, मात्र जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्र ारी झाल्या होत्या. याबाबत राज्य सरकारने ग्रामविकास सुधारणा विधेयक मंजूर केल्याने नव्या आदेशानुसार आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, सप्तशृंगगड, नांदुरी, ओतूर, मेहदर, नरूळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, पाळे बुद्रुक, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, वीरशेत, वडाळे (हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे (क), काठरे, गोसराणे या २९ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला निवडणूक होत आहे. १३ मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले होते. या नव्या आदेशामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अडचणीत आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ मार्च असताना अनेकांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने राखीव जागांवर निवडणूक लढवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता.यासंदर्भात तक्र ारी झाल्याने सरकारने ग्रामविकास सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर नव्या आदेशानुसार आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवाराला निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा पद रद्द होईल. या नव्या निर्णयाने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.अर्जासाठी १६ मार्चपर्यंत मुदतवाढजातवैधता प्रमाणपत्राचा घोळ, शासकीय सुट्ट्या या कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता पुरेसा अवधी मिळाला नाही. हे लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने गुरु वारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १० (अ) अन्वये तथा राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ दिली आहे. आता नवीन निर्देशानुसार सोमवारपर्यंत (दि.१६) सरकारी सुट्टीचे दिवस वगळून इच्छुकांना त्यांचे नामनिर्देशन पत्र भरता येतील.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक