शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लासलगावी कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:04 IST

लासलगाव : येथील कांदा बाजारपेठेत कांद्याच्या दरात २५० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतित भर पडली आहे. जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. त्याचा कांद्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. शासनाने १५ मार्चपासून कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याचे दर वाढतील अशी आशा होती, मात्र कोरोनामुळे दर घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोना : आवक वाढली; निर्यातबंदी उठवूनही शेतकरी चिंतित

लासलगाव : येथील कांदा बाजारपेठेत कांद्याच्या दरात २५० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतित भर पडली आहे.जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. त्याचा कांद्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. शासनाने १५ मार्चपासून कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याचे दर वाढतील अशी आशा होती, मात्र कोरोनामुळे दर घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शनिवारच्या तुलनेत सोमवारी (दि. १६) लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात २५० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली.कांदा निर्यात खुली करावी यासाठी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने केली. केंद्र सरकारने निर्यात खुली केली. त्यानुसार १५ मार्चपासून कांद्याची निर्यात बांग्लादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरू झाली. मात्र सध्या भारतासह जगभरात कोरोनाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या निर्यातीवरही दिसून येत आहे.लासलगाव बाजार समितीत १६०० वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त १७९०, कमीत कमी १००० तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लाल कांद्याला कमाल १७८०, कमीत कमी ९००, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. गेल्या १३ दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यातबंदी उठणार असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवला. बाजार समितीत कांद्याची एकाच वेळी मोठी आवक झाल्याने दर प्रतिक्विंटल २५० रु पयांनी घसरले. कांदा निर्यातप्रक्रि या सुरळीत होण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली होती. त्यात निर्यात करताना पतपत्र, किमान निर्यातमूल्य नसल्याचे जाहीर करण्यात आले. पाच महिन्यांनंतर कांदा निर्यात सुरळीत होणार असल्याने जिल्ह्यातील व्यापाºयांनी कांदा माल बंदरावर पाठवायला सुरु वात केली आहे.कांद्याला दुबई, ओमान, मस्कतसह दक्षिण आशियामधील सिंगापूर, मलेशिया व श्रीलंका या देशातून मागणी आहे. निर्यात उठविण्याची घोषणा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मालाची चौकशी होऊ लागल्यानंतर स्थानिक व्यापाºयांनी त्या अनुषंगाने तयारी करून माल पाठवायला सुरुवात केली आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, कळवण, नामपूर आदी बाजारातील व्यापाºयांनी तयारी पूर्ण केली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा