शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्रासाठी झाली होती कुसुमाग्रजांना अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:17 IST

संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य प्र. के. अत्रे, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या तत्कालीन ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनीदेखील संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनात योगदान दिले होते.  त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचे  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीदेखील त्या  काळी नाशिकला झालेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अटक झाली होती. 

ठळक मुद्देअसाही गर्जा जयजयकार  : कोर्ट उठेपर्यंत  न्यायालयातच बसून राहण्याची दिली होती शिक्षा

नाशिक : संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य प्र. के. अत्रे, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या तत्कालीन ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनीदेखील संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनात योगदान दिले होते.  त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचे  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीदेखील त्या  काळी नाशिकला झालेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अटक झाली होती. नाशिकमध्ये साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनासाठी मिरवणुका आणि शोभायात्रा सातत्याने निघत होत्या. कुसुमाग्रज हे जनभावनांच्या वास्तवाशी जोडलेले आणि जनसामान्यांमध्ये राहणारे कवी होते. त्यामुळे नाशकातही सातत्याने आंदोलने होऊ लागल्यावर त्यांनीदेखील एका आंदोलनाचे  नेतृत्व केले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तात्यासाहेबांनी  सत्याग्रह केला ही त्या दिवशाची सर्वात मोठी घटना होती. पोलिसांनी त्यांना अटक करून कोर्टात उभे केले होते. कोर्टात उभे राहिल्यानंतर  तत्कालीन न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा कबूल आहे का , असे विचारले.  त्यावेळी तात्यासाहेबांनी गुन्हा कबूल केला. तेव्हा कोर्टाने त्यांना कोर्ट उठेपर्यंत न्यायालयातच बसून राहण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात कोर्ट बरखास्त करण्यात आल्याने त्यांची शिक्षादेखील संपु्ष्टात आली होती. ६१ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या जुन्या स्मृतींना उजाळा मिळत आहे. दोघांचे हौतात्म्य संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत ज्या १०५ वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्यात नाशिकचे गणपत श्रीधर जोशी आणि माधवराव राजाराम तुरे (बेलदार) यांचा समावेश आहे. रविवार कारंजा भागात उसळलेल्या दंगलीनंतर झालेल्या गोळीबारात ते दोघे गोळी लागून गतप्राण झाले होते. तसेच चित्रमंदिर चित्रपटगृह परिसरात बाळासाहेब शेंडगे यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांचा पाय कायमचाच अधू झाला होता. त्याशिवाय नाशिकच्या आंदोलनात तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते ॲड. दौलतराव घुमरे, रावसाहेब थोरात, ॲड. द. तु. जायभावे, इक्बाल हसरत, बी.डी. जाधव, शाहीर गजाभाऊ बेणी यांचादेखील समावेश होता.

टॅग्स :NashikनाशिकKusumagrajकुसुमाग्रजMaharashtraमहाराष्ट्र