शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नाशिककरांना चाखयला मिळाला कोकण हापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 4:05 PM

नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले.

ठळक मुद्देनाशिककरांनी चाखला कोणच्या हापूसचा स्वादपणन मंडळाच्या आंबा महोत्सवाला उत्फूर्त प्रतिसाद आंबा महोत्सवात 20 लाख रुपयांची उलाढाल

नाशिक : नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले. कोकणची ओळख असलेल्या हापूसचा प्रामुख्याने समावेश असलेल्या आंबा महोत्सवाला नाशिककरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. पणन मंडळाच्या नाशिक शाखेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहाच्या आवारात मंगळपारपासून सुरू असलेल्या आंबा महोत्सवाचा रविवारी (दि.20) समारोप झाला. अशाप्रकारे शासकीय यंत्रणोमार्फत नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित आंबा महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोकणातून नाशिकमध्ये आबा विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांनीही समाधान व्यक्त केले असून अशाप्रकारे दरवर्षी आंबा महोत्सवाचे नियोजन होण्याची गरज कोकणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.त्यामुळेच रविवापर्यंत चालणाऱ्या महोत्सवात बहूंतांश शेतकऱ्यांचे आंबे शनिवारपर्यंत सपल्याचे दिसून आले. या आंबा महोत्सवात रत्नागिरी, देवगड, राजापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे उपलब्ध असल्याने नाशिककरांची या आंब्याना चागलीच पसंती मिळाली. आंबा महोत्सवात 300ते 700रुपये डजनापासून आकारानुसार तीन ते पाच डझनाची लाकडी पेटी 2 हजार रुपयांपासून मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी थेट पेटीच खरेदी करणो पसंत केले. त्यामुळे रविवापर्यंत चालणाऱ्या या आंबा महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा माल शनिवारीच संपल्याची माहिती पणन मंडळातर्फे देण्यात आली. दरम्यान, ग्राहकांचा ओघ पाहून काही शेतकऱ्यांनी रविवारी काही प्रमाणात नव्याने माल मागविल्याची माहीती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.20 लाख रुपयांंची उलाढालआंबा महोत्सवात सहभागी 14 शेतकऱ्यांचा जवळपास सर्व माल विकला गेल्याने या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा प्रत्येकी 1 लाख 25 हजार ते दीड लाख रुपयांपर्यत व्यावसाय झाला. त्यामुळे या आंबा महोत्सवात सुमारे 20 ते 21 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली आहे.

टॅग्स :MangoआंबाNashikनाशिकFarmerशेतकरी