शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

बालविवाहाविरोधात ‘खाकी’ला हवी लोकप्रतिनिधींची साथ! : रुपाली चाकणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 01:50 IST

"कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे!"

ठळक मुद्दे ग्रामीण भागात अल्पवयीनांचे विवाहाचे प्रमाण चिंताजनक

नाशिक : कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शहरात बालविवाहाचे प्रमाण नगण्य जरी असले तरी ग्रामीण भागात याबाबत चिंताजनक चित्र असल्याचे चाकणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंगळवारी (दि. १२) चाकणकर या नाशिक शहराच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शहर पोलीस आयुक्तालयासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाला भेट देत एकूणच महिलांविषयक गुन्हेगारीचा तसेच विधी सेवा आयोगाकडून लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेले खटले याबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी समाधानकारक आढावा असल्याचे सांगितले. दरम्यान, आयुक्तालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते

बालविवाहासारखी अनिष्ट प्रथा काही ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागात आजही पाळली जाते; मात्र या अनिष्ट रुढी, प्रथेविरुद्ध समाजाची मानसिकता बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकारदेखील महत्त्वाचा आहे, असेही चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, शहर पोलीस दलातील महिला अंमलदार ज्योती मेसट व सरला खैरणार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ‘वीरकन्या’ म्हणून प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.

‘मनोधैर्य’अंतर्गत १२० तक्रारींचा निपटारा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत चांगले काम सुरू आहे. मनोधैर्य योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या १४४ तक्रारींपैकी १२० निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २३ तक्रारींबाबत काही कागदपत्रे अपूर्ण असून पीडितांकडून त्यांची पूर्तता होताच त्यांना लाभ दिला जाईल, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

...तर सरपंचांना धरा जबाबदार

बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी रोखण्यासाठी ग्रामीण भागात चर्चासत्रे राबविण्याची सूचना जिल्हा विधी प्राधिकरणाला करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत बालविवाहाचा प्रकार समोर येईल, त्या गावच्या सरपंचांना जबाबदार धरण्यात यावे, अशी शिफारस राज्य महिला आयोगाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारकडे केली आहे. आता नव्या सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या ७४० तक्रारी ‘सायबर’कडून निकाली

सोशल मीडियाद्वारे महिलांबाबत घडलेले गुन्हे रोखण्यासाठी शहर सायबर पोलिसांकडून उचलण्यास आलेले पाऊल कौतुकास्पद आहे. सायबर पोलिसांना महिलांच्या संबंधित सोशल मीडियाबाबत प्राप्त १२०० तक्रारींपैकी सुमारे पावणेआठशे तक्रारींचा निपटारा करण्यास वर्षभरात यश आले आहे, ही समाधानकारक बाब आहे. याबाबत अन्य शहरांमधील सायबर पोलिसांनीही अशा पद्धतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

---

टॅग्स :NashikनाशिकRupali Chakankarरुपाली चाकणकर