शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

बालविवाहाविरोधात ‘खाकी’ला हवी लोकप्रतिनिधींची साथ! : रुपाली चाकणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 01:50 IST

"कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे!"

ठळक मुद्दे ग्रामीण भागात अल्पवयीनांचे विवाहाचे प्रमाण चिंताजनक

नाशिक : कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शहरात बालविवाहाचे प्रमाण नगण्य जरी असले तरी ग्रामीण भागात याबाबत चिंताजनक चित्र असल्याचे चाकणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंगळवारी (दि. १२) चाकणकर या नाशिक शहराच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शहर पोलीस आयुक्तालयासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाला भेट देत एकूणच महिलांविषयक गुन्हेगारीचा तसेच विधी सेवा आयोगाकडून लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेले खटले याबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी समाधानकारक आढावा असल्याचे सांगितले. दरम्यान, आयुक्तालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते

बालविवाहासारखी अनिष्ट प्रथा काही ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागात आजही पाळली जाते; मात्र या अनिष्ट रुढी, प्रथेविरुद्ध समाजाची मानसिकता बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकारदेखील महत्त्वाचा आहे, असेही चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, शहर पोलीस दलातील महिला अंमलदार ज्योती मेसट व सरला खैरणार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ‘वीरकन्या’ म्हणून प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.

‘मनोधैर्य’अंतर्गत १२० तक्रारींचा निपटारा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत चांगले काम सुरू आहे. मनोधैर्य योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या १४४ तक्रारींपैकी १२० निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २३ तक्रारींबाबत काही कागदपत्रे अपूर्ण असून पीडितांकडून त्यांची पूर्तता होताच त्यांना लाभ दिला जाईल, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

...तर सरपंचांना धरा जबाबदार

बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी रोखण्यासाठी ग्रामीण भागात चर्चासत्रे राबविण्याची सूचना जिल्हा विधी प्राधिकरणाला करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत बालविवाहाचा प्रकार समोर येईल, त्या गावच्या सरपंचांना जबाबदार धरण्यात यावे, अशी शिफारस राज्य महिला आयोगाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारकडे केली आहे. आता नव्या सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या ७४० तक्रारी ‘सायबर’कडून निकाली

सोशल मीडियाद्वारे महिलांबाबत घडलेले गुन्हे रोखण्यासाठी शहर सायबर पोलिसांकडून उचलण्यास आलेले पाऊल कौतुकास्पद आहे. सायबर पोलिसांना महिलांच्या संबंधित सोशल मीडियाबाबत प्राप्त १२०० तक्रारींपैकी सुमारे पावणेआठशे तक्रारींचा निपटारा करण्यास वर्षभरात यश आले आहे, ही समाधानकारक बाब आहे. याबाबत अन्य शहरांमधील सायबर पोलिसांनीही अशा पद्धतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

---

टॅग्स :NashikनाशिकRupali Chakankarरुपाली चाकणकर