शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कळवणच्याआठ प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:01 IST

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

ठळक मुद्देपाझर तलाव कोरडे भूजल पातळी घसरली; पाणीबाणीची स्थिती

मनोज देवरे । लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे.पुनंद प्रकल्पातील पाणी थेट मालेगाव तालुक्यातील टेहरेगावापर्यंत पोहोचविण्यात आल्याने पुनंद प्रकल्पात केवळ १०८ दशलक्ष घनफूट इतका अल्पपाणीसाठा शिल्लक आहे. मळगाव (चिंचपाडा), भेगू, धनोली, जामलेवणी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक असून, नांदुरी, ओतूर, गोबापूर, मार्कंडपिंप्री, धार्डेदिगर, बोरदैवत, भांडणे, खिराड लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला असून, तालुक्यातील भूजल पातळीदेखील खाली गेल्याने कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती कळवण तालुक्यात निर्माण झाली आहे. काही दिवसात पाऊस बरसला नाही तर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल.कळवण तालुक्यात दोन मोठे धरणे व ११ मध्यम प्रकल्प आहेत, त्यांची एकूण साठवण क्षमता ५२०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला १५ जून २०१९ पर्यंत केवळ २४५ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ४.७१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मळगाव (चिंचपाडा) लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ९२.६६ दशलक्ष घनफूट असून, आजफक्त ३.५ दशलक्ष घनफूट (२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे, तर भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ९७.६७ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजमितीस ३६.९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.पुनंद परिसरात पाणीटंचाईपुनंद प्रकल्प परिसरातील बंधारपाडा, उंबरगव्हाण, शिरसापाडा, उंबºयामाळ, जांभाळ, महाल, उंबरदे, चोळीचा माळ, औत्यापाणी, धुमंदर, खळीचापाडा, गढीचा पाडा, मोºयाहूड या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असून, शेजारील गुजरात राज्यात पाच किमी पायपीट करून पाणी आणून आदिवासी बांधवांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याचा आसरा घेऊन दिवस काढले जात आहे.पुनंद धरणाखालील सुपले , शेरी, भैताणे, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याणे, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावामध्ये पाणीटंचाई जाणवते. मालेगावसाठी पुनंदमधून पाणी सोडल्यानंतर या भागातील जनतेला दिलासा मिळाला आहे. सध्या अल्प साठा असल्याने भविष्यात या भागाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.लाखो लिटर पाण्याची वाहतूकशासनस्तरावर कळवण तालुका टँकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कळवण तालुक्यातील पुनंदनगर व कातळगाव येथे सध्या टँकर सुरू असून, खांडवीपाडा, जिरवाडे (ओ.), ओतूर, दह्याणे (ओ.), आठंबे, सादडविहीर, भेंडी येथे पाणीटंचाई असल्यामुळे टँकरची सुरू करण्याची नामुष्की आली आहे. ओतूर परिसरात ओतूर, कळवण खुर्द, कुंडाणे, शिरसमणी भागातील विहिरी कोरड्याठाक पडल्याने या भागातील फळबागा व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर धावत आहे.चणकापूर धरणातील मोठा साठा मालेगावसाठी आरक्षित असतो. झालेला पाऊस आणि आरक्षित पाणी याव्यतिरिक्त जे पाणी शिल्लक राहू शकते त्याचा अंदाज करून पाणी आवर्तन दिले जाते. कळवण, बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून आहे. पुनंद व चणकापूरमधून सध्या पाणी सोडल्याने पाण्याची तहान भागली आहे. चणकापूरमधील पाणीसाठा कमी झाल्यास पुनंद प्रकल्पातून पाणी घेऊन पाणी सोडले जाते. तत्कालीन परिस्थितीनुसार चणकापूरचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आज पाण्याची मागणी वाढली आहे.सर्वच क्षेत्रात वाढ झाल्याने पाणी कमी पडू लागले आहे. आज मात्र चणकापूर धरण कोरडेठाक झाले असून, पुनंदमध्ये जेमतेम साठा आहे.धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता १७.५४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आज २१.०७ दशलक्ष घनफूट (१४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.तर जामलेवणी लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६२.८८ दशलक्ष घनफूट असून, आज ११.२२ दशलक्ष घनफूट (१८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प