शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 8:44 PM

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .

ठळक मुद्देखामखेडा : शेतकरी चिंतातुर; दुबार पेरणी ओढावण्याची भिती

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .कारण पिकाची उगवण झाल्यानंतर थोडेसे पीक मोठी झाल्यावर पिकाचे मुळ खोलवर अठरा इंच पर्यत जातात. परंतु या अल्पशा पाऊसाने जमिनीचा ओलावा सह इंच होता. त्यावर शेतकºयाने पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकºयाने महागडी बियाणे घेऊन पिकाची पेरणी केली आहे.काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. पिके थोडी मोठी झाल्याने त्याची पाण्याची भूक वाढली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून, पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जूलै महिन्याच्या पंधरा दिवसाहून अधिक कालावधी होत आला आहे. परंतु या पंधरा दिवसामघ्ये एकदाही दमदार पाऊस झाला नाही.पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप निट पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात शेवटी झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे.पाऊस नाही व उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे.पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशी भिती आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे.