शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

कळवण : तालुक्यातील ४० गावांच्या शेतकºयांचा ग्रामसभेत ठराव सटाणा जलवाहिनीस तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:34 IST

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न पेटण्याची चिन्हेजलवाहिनी योजना मंजूर

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे. या विषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करण्यात आल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी याप्रश्नी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने ५५ कोटी रुपयांची जलवाहिनी योजना मंजूर करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेला कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी पुनंद प्रकल्पांतर्गत येणाºया कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या गाठीभेटी घेऊन या योजनेला विरोध दर्शवण्याची भूमिका भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल त्या सभेत सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध दर्शविणारे ठराव करण्याचे आवाहन केले होते. २६ जानेवारीच्या ग्रामसभांवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने तालुक्यात अन्य दिवशी ग्रामसभा घेण्यात येऊन जलवाहिनीला विरोध असल्याचे ठराव करण्यात आले. यात सुपले दिगर, काठरे दिगर, शेरी, भैताणे, निमपाडा, जयदर, सुळे, सावरपाडा, पिंपळे, चाफापाडा, दह्याणे, हुंड्यामोख, उंबरेबन, पिंपळे खुर्द, गणोरे, पाडगण, नाळीद, भांडणे, इन्शी, देसराणे, रवळजी, कोकणीपाडा, मोकभणगी, दरेभणगी, ककाणे, खेडगाव, नाकोडे, पाटविहीर, विसापूर, बिजोरे, नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, बगडू, चाचेर, धनगरपाडा, पिळकोस, खामखेडा, सावकी परिसरातील ४० गावे व वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी बांधवांनी विरोध दर्शविला आहे.तालुक्यात साकारलेल्या अर्जुनसागर (पुनंद) या जलप्रकल्पामध्ये असलेल्या पाण्यावर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा व जनतेचा प्रथम हक्क असल्याने तालुक्यातील पाणी बाहेर जाऊ देण्यास शेतकरी बांधवांनी व जनतेने ग्रामसभांमधून कडाडून विरोध केल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदनाची प्रत पाठवून या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यामुळे सटाणा नगरपालिकेची जलवाहिनी योजना संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्जुनसागर (पुनंद )प्रकल्प व त्याअंतर्गत असलेल्या सुळे उजवा व डावा कालवा तसेच सुपले उजवा व डावा कालवा व पोटचारीसाठी शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी हातच्या गेल्या असून त्याचा मोबदला अजूनही पदरात पडलेला नाही. कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी तहानलेला असताना सटाणा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवावर अन्याय केला आहे, अशी भावना कळवण तालुक्यातील जनतेतून निर्माण होत आहे.