शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कळवण : तालुक्यातील ४० गावांच्या शेतकºयांचा ग्रामसभेत ठराव सटाणा जलवाहिनीस तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:34 IST

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न पेटण्याची चिन्हेजलवाहिनी योजना मंजूर

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे. या विषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करण्यात आल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी याप्रश्नी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने ५५ कोटी रुपयांची जलवाहिनी योजना मंजूर करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेला कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी पुनंद प्रकल्पांतर्गत येणाºया कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या गाठीभेटी घेऊन या योजनेला विरोध दर्शवण्याची भूमिका भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल त्या सभेत सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध दर्शविणारे ठराव करण्याचे आवाहन केले होते. २६ जानेवारीच्या ग्रामसभांवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने तालुक्यात अन्य दिवशी ग्रामसभा घेण्यात येऊन जलवाहिनीला विरोध असल्याचे ठराव करण्यात आले. यात सुपले दिगर, काठरे दिगर, शेरी, भैताणे, निमपाडा, जयदर, सुळे, सावरपाडा, पिंपळे, चाफापाडा, दह्याणे, हुंड्यामोख, उंबरेबन, पिंपळे खुर्द, गणोरे, पाडगण, नाळीद, भांडणे, इन्शी, देसराणे, रवळजी, कोकणीपाडा, मोकभणगी, दरेभणगी, ककाणे, खेडगाव, नाकोडे, पाटविहीर, विसापूर, बिजोरे, नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, बगडू, चाचेर, धनगरपाडा, पिळकोस, खामखेडा, सावकी परिसरातील ४० गावे व वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी बांधवांनी विरोध दर्शविला आहे.तालुक्यात साकारलेल्या अर्जुनसागर (पुनंद) या जलप्रकल्पामध्ये असलेल्या पाण्यावर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा व जनतेचा प्रथम हक्क असल्याने तालुक्यातील पाणी बाहेर जाऊ देण्यास शेतकरी बांधवांनी व जनतेने ग्रामसभांमधून कडाडून विरोध केल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदनाची प्रत पाठवून या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यामुळे सटाणा नगरपालिकेची जलवाहिनी योजना संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्जुनसागर (पुनंद )प्रकल्प व त्याअंतर्गत असलेल्या सुळे उजवा व डावा कालवा तसेच सुपले उजवा व डावा कालवा व पोटचारीसाठी शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी हातच्या गेल्या असून त्याचा मोबदला अजूनही पदरात पडलेला नाही. कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी तहानलेला असताना सटाणा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवावर अन्याय केला आहे, अशी भावना कळवण तालुक्यातील जनतेतून निर्माण होत आहे.