शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
3
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
4
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
7
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
8
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
9
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
10
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
11
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
12
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
13
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
14
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 15:26 IST

यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही.

ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये जनजागृतीग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसकृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा

नाशिक : भंडारदरा वनपरिक्षेत्र ते राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत पसरलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात यावर्षी स्थानिक लोकसहभाग आणि लॉकडाउन सुरू असल्याने बाहेरून पर्यटक दाखल न झाल्यामुळे कृत्रिम वनवणव्यांचा भडका फारसा उडाला नाही. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अभयारण्यातील वनक्षेत्र वणव्यापासून अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत झाली.नाशिक वनवृत्तातील वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. वर्षाच्या बारामहिने येथे पर्यटकांचा राबता कायम असतो. यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, सचिन धिंदळे यांनी अभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये फिरून जनजागृती करत वनवणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. वनवणव्यांमुळे होणारी अपरिमित हानी स्थानिक लोकांना पटवून दिली. तसेच कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो व त्या गुन्ह्यात शिक्षेचे स्वरूपदेखील गंभीर असल्याचे लोकांना समजावून सांगितले. यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीची मदत घेत ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले. यामुळे स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या शेतात राख भाजताना आवश्यक खबरदारी घेतली. परिणामी अभयारण्य क्षेत्रात जेमतेम पाच ते सहा किरकोळ स्वरूपाच्या वणव्याच्या घटना उन्हाळ्यात घडल्या. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदा भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील अभयारण्य वणव्यांपासून सुरक्षित राहू शकल्याचे पडवळे म्हणाले. प्रत्येक गावागावांमध्ये भेटी देत तेथील लोकांमध्ये वणव्यांपासून होणारे नुकसान याविषयी जागृती करणे, तसेच कृत्रिम वनवे कसे टाळावे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहे, याविषयीचे प्रबोधन करण्यावर वनरक्षक बालिका फुंदे, गोविंदा आडळ, संजय गिते, दत्तु भोये, महेंद्र पाटील, राजेंद्र आहेर आदींनी विशेष भर दिला.

गेल्या वर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र बाधितमागील वर्षी उन्हाळ्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस ठिकाणी कृत्रिम वनवणव्यांचा भडका उडाला होता. यामुळे अभयारण्याचे सरासरी दोन एकर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी मात्र केवळ चार ते पाच ठिकाणी किरकोळ स्वरूपात वणवा पेटल्याचा दावा भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केला आहे.ग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसजे गाव आपल्या शिवारातील वनक्षेत्र वणव्यापासून सुरक्षित ठेवण्यास यशस्वी होईल, त्या गावाच्या ग्रामपंचायतीला वन्यजीव विभागाकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यामुळे गावकºयांनी अधिक सकारात्मक विचार करत कृत्रिम वणवे रोखण्याचा प्रयत्न केला.

या गावांना आले यशपेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, रतनवाडी, कोलटेंबे, साम्रद, पेरुंगण, घाटघर या गावांमध्ये जनजागृती केली. या गावांनीदेखील ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व ग्रामपंचायतीला सहकार्य करत आपआपल्या हद्दीत वनवणवे लागणार नाही, याची दक्षता घेतली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागAhmednagarअहमदनगरfireआगenvironmentपर्यावरण