शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 15:26 IST

यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही.

ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये जनजागृतीग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसकृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा

नाशिक : भंडारदरा वनपरिक्षेत्र ते राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत पसरलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात यावर्षी स्थानिक लोकसहभाग आणि लॉकडाउन सुरू असल्याने बाहेरून पर्यटक दाखल न झाल्यामुळे कृत्रिम वनवणव्यांचा भडका फारसा उडाला नाही. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अभयारण्यातील वनक्षेत्र वणव्यापासून अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत झाली.नाशिक वनवृत्तातील वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. वर्षाच्या बारामहिने येथे पर्यटकांचा राबता कायम असतो. यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, सचिन धिंदळे यांनी अभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये फिरून जनजागृती करत वनवणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. वनवणव्यांमुळे होणारी अपरिमित हानी स्थानिक लोकांना पटवून दिली. तसेच कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो व त्या गुन्ह्यात शिक्षेचे स्वरूपदेखील गंभीर असल्याचे लोकांना समजावून सांगितले. यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीची मदत घेत ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले. यामुळे स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या शेतात राख भाजताना आवश्यक खबरदारी घेतली. परिणामी अभयारण्य क्षेत्रात जेमतेम पाच ते सहा किरकोळ स्वरूपाच्या वणव्याच्या घटना उन्हाळ्यात घडल्या. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदा भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील अभयारण्य वणव्यांपासून सुरक्षित राहू शकल्याचे पडवळे म्हणाले. प्रत्येक गावागावांमध्ये भेटी देत तेथील लोकांमध्ये वणव्यांपासून होणारे नुकसान याविषयी जागृती करणे, तसेच कृत्रिम वनवे कसे टाळावे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहे, याविषयीचे प्रबोधन करण्यावर वनरक्षक बालिका फुंदे, गोविंदा आडळ, संजय गिते, दत्तु भोये, महेंद्र पाटील, राजेंद्र आहेर आदींनी विशेष भर दिला.

गेल्या वर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र बाधितमागील वर्षी उन्हाळ्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस ठिकाणी कृत्रिम वनवणव्यांचा भडका उडाला होता. यामुळे अभयारण्याचे सरासरी दोन एकर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी मात्र केवळ चार ते पाच ठिकाणी किरकोळ स्वरूपात वणवा पेटल्याचा दावा भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केला आहे.ग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसजे गाव आपल्या शिवारातील वनक्षेत्र वणव्यापासून सुरक्षित ठेवण्यास यशस्वी होईल, त्या गावाच्या ग्रामपंचायतीला वन्यजीव विभागाकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यामुळे गावकºयांनी अधिक सकारात्मक विचार करत कृत्रिम वणवे रोखण्याचा प्रयत्न केला.

या गावांना आले यशपेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, रतनवाडी, कोलटेंबे, साम्रद, पेरुंगण, घाटघर या गावांमध्ये जनजागृती केली. या गावांनीदेखील ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व ग्रामपंचायतीला सहकार्य करत आपआपल्या हद्दीत वनवणवे लागणार नाही, याची दक्षता घेतली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागAhmednagarअहमदनगरfireआगenvironmentपर्यावरण