शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 15:26 IST

यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही.

ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये जनजागृतीग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसकृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा

नाशिक : भंडारदरा वनपरिक्षेत्र ते राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत पसरलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात यावर्षी स्थानिक लोकसहभाग आणि लॉकडाउन सुरू असल्याने बाहेरून पर्यटक दाखल न झाल्यामुळे कृत्रिम वनवणव्यांचा भडका फारसा उडाला नाही. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अभयारण्यातील वनक्षेत्र वणव्यापासून अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत झाली.नाशिक वनवृत्तातील वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. वर्षाच्या बारामहिने येथे पर्यटकांचा राबता कायम असतो. यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, सचिन धिंदळे यांनी अभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये फिरून जनजागृती करत वनवणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. वनवणव्यांमुळे होणारी अपरिमित हानी स्थानिक लोकांना पटवून दिली. तसेच कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो व त्या गुन्ह्यात शिक्षेचे स्वरूपदेखील गंभीर असल्याचे लोकांना समजावून सांगितले. यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीची मदत घेत ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले. यामुळे स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या शेतात राख भाजताना आवश्यक खबरदारी घेतली. परिणामी अभयारण्य क्षेत्रात जेमतेम पाच ते सहा किरकोळ स्वरूपाच्या वणव्याच्या घटना उन्हाळ्यात घडल्या. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदा भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील अभयारण्य वणव्यांपासून सुरक्षित राहू शकल्याचे पडवळे म्हणाले. प्रत्येक गावागावांमध्ये भेटी देत तेथील लोकांमध्ये वणव्यांपासून होणारे नुकसान याविषयी जागृती करणे, तसेच कृत्रिम वनवे कसे टाळावे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहे, याविषयीचे प्रबोधन करण्यावर वनरक्षक बालिका फुंदे, गोविंदा आडळ, संजय गिते, दत्तु भोये, महेंद्र पाटील, राजेंद्र आहेर आदींनी विशेष भर दिला.

गेल्या वर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र बाधितमागील वर्षी उन्हाळ्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस ठिकाणी कृत्रिम वनवणव्यांचा भडका उडाला होता. यामुळे अभयारण्याचे सरासरी दोन एकर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी मात्र केवळ चार ते पाच ठिकाणी किरकोळ स्वरूपात वणवा पेटल्याचा दावा भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केला आहे.ग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसजे गाव आपल्या शिवारातील वनक्षेत्र वणव्यापासून सुरक्षित ठेवण्यास यशस्वी होईल, त्या गावाच्या ग्रामपंचायतीला वन्यजीव विभागाकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यामुळे गावकºयांनी अधिक सकारात्मक विचार करत कृत्रिम वणवे रोखण्याचा प्रयत्न केला.

या गावांना आले यशपेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, रतनवाडी, कोलटेंबे, साम्रद, पेरुंगण, घाटघर या गावांमध्ये जनजागृती केली. या गावांनीदेखील ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व ग्रामपंचायतीला सहकार्य करत आपआपल्या हद्दीत वनवणवे लागणार नाही, याची दक्षता घेतली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागAhmednagarअहमदनगरfireआगenvironmentपर्यावरण