शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

रेल्वेमार्गाला जमीन देण्यास ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:22 PM

नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देनाशिक : पुणे सेमी हायस्पिड रेल्वे; शेतजमिनी अधिग्रहित होण्याची शेतकऱ्यांना भीती

नायगाव : नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून व राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळताच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे असले तरी मध्य रेल्वेच्या मंजुरीमुळे हा मार्ग होणार हे नक्की मानले जात आहे. त्यामुळे खोºयातील मोह, वडझिरे, ब्राह्मणवाडे, जायगाव, देशवंडी आदी गावांतील ज्या शेतकºयांच्या शेतातून मोजणी झाली आहे, अशा शेतकºयांमध्ये जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे बेभरवशाच्या शेती व्यवसायाला कंटाळलेले शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे, तर अनेक शेतकरी या मार्गातून आपली जमीन वाचविण्यासाठी मार्ग शोधत आहेत.गेल्या २०-२२ वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची वारंवार चर्चा होत होती. या मार्गासाठी नायगाव खोºयातून अनेकदा विविध ठिकाणाहून जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात या मार्गाची अर्थसंकल्पात तरतूद केल्याने हा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सध्या या मार्गाचे काम थोड्याच दिवसात सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक, मोहदरी, सिन्नर, दोडी, चास, देवठाण, संगमनेर, अंबुरे, साकूर, जांबूत, बोटा, आळेफाटा, नारायण गाव, मंचर, भोरवडी, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, वाघोली, कोलवडी, मांजरी, हडपसर, पुणे असे या मार्गातील प्रस्तावित थांबे आहे. तसेच नाशिक व पुण्यामधील औद्योगिक क्षेत्रातही थांबे असणार आहे. नायगाव खोºयातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह आदी गावांतून आजपर्यंत अनेकवेळा रेल्वेमार्गाची मोजणी करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे सध्याच्या मंजुरीनंतरही हे काम सुरू होणार का, असा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. अशातच परिसरातील विविध भागातून ही मोजणी झाली असल्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणाहून हा मार्ग जाणार आहे, त्याबाबत शेतकºयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी