शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

अवघ्या ४१२ दिवसांचे सौभाग्य

By admin | Updated: May 20, 2017 01:39 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली.

 लोकमत न्यूज नेटवर्क  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली. त्यामुळे कर्जासह कॅन्सरग्रस्त सासू, वृद्ध सासरा आणि अडीच महिन्याचा मुलगा सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. शेतीवरच्या कर्जामुळे सर्व जीविताचे मार्गबंद झाले असून, शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर पतीनंतर आपल्यासमोरही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी व्यथा शिवसेना कृषी अधिवेशनात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांची परिस्थिती मांडताना सटाण्यातील राहूरच्या कल्याणी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. कर्जाच्या डोंगरामुळे आणि नापिक ीने लग्नानंतर अवघ्या तेरा महिन्यांत सौभाग्य हरपल्यानंतर या धक्क्यातून सावरताना सासू, सासरे, अडीच महिन्याचा मुलगा आणि लग्नाला आलेली नणंद असे कुटुंब सांभाळताना होणारी परवड सांगताना ठाकरे गहिवरल्या. पतीच्या आत्महत्येनंतरीही कर्जाचा डोंगर सातत्याने वाढताच आहे, त्यामुळे शेती करणेही कठीण झाले आहे. कर्जमाफी मिळाली नाही, तर जगणे अशक्य झाले आहे. सरकार पैसे नसल्याचे सांगत कर्जमाफी देण्याचे टाळत आहे. स्वच्छ भारतसारख्या योजनांच्या जाहिरातींवर खर्च करण्यासाठी चित्रपटांना सवलती देण्यासाठी पैसा खर्च होत असताना माझ्यासारख्या विधवांवर आत्महत्येची वेळ का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.