शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४१२ दिवसांचे सौभाग्य

By admin | Updated: May 20, 2017 01:39 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली.

 लोकमत न्यूज नेटवर्क  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली. त्यामुळे कर्जासह कॅन्सरग्रस्त सासू, वृद्ध सासरा आणि अडीच महिन्याचा मुलगा सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. शेतीवरच्या कर्जामुळे सर्व जीविताचे मार्गबंद झाले असून, शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर पतीनंतर आपल्यासमोरही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी व्यथा शिवसेना कृषी अधिवेशनात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांची परिस्थिती मांडताना सटाण्यातील राहूरच्या कल्याणी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. कर्जाच्या डोंगरामुळे आणि नापिक ीने लग्नानंतर अवघ्या तेरा महिन्यांत सौभाग्य हरपल्यानंतर या धक्क्यातून सावरताना सासू, सासरे, अडीच महिन्याचा मुलगा आणि लग्नाला आलेली नणंद असे कुटुंब सांभाळताना होणारी परवड सांगताना ठाकरे गहिवरल्या. पतीच्या आत्महत्येनंतरीही कर्जाचा डोंगर सातत्याने वाढताच आहे, त्यामुळे शेती करणेही कठीण झाले आहे. कर्जमाफी मिळाली नाही, तर जगणे अशक्य झाले आहे. सरकार पैसे नसल्याचे सांगत कर्जमाफी देण्याचे टाळत आहे. स्वच्छ भारतसारख्या योजनांच्या जाहिरातींवर खर्च करण्यासाठी चित्रपटांना सवलती देण्यासाठी पैसा खर्च होत असताना माझ्यासारख्या विधवांवर आत्महत्येची वेळ का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.