शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

न्यायव्यवस्थेसाठी चार टक्क्यांपर्यंत तरतूद हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:54 IST

अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे.

नाशिक : अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे.भारतात पंधरा हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे. विदेशांमध्ये एक हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे. न्यायाधीश, न्यायालयांच्या अपुऱ्या संख्येमुळे खटल्यांचा निपटारा होण्यास देशात विलंब लागतो. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेला अधिकाधिक सोयी-सुविधा पुरवून बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून दोन ते चार टक्क्यांपर्यंत तरतूद होणे गरजेचे असल्याचे मत शहरातील विधीज्ञांनी व्यक्त केले....तर वाढेल न्यायाधीशांची संख्यातरतूद अत्यल्प असल्यामुळे न्यायाधीशांची संख्या अपुरी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात दोन टक्क्यांपर्यंत तरतूद गरजेची आहे. दहा लाख लोकांमागे ५० न्यायाधीश असावे, असा ठराव झाला आहे. अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेवर १० टक्के खर्च करावा, अशी घटना सांगते. प्रत्यक्षात आतापर्यंत ०.१९ ते ०.२३ टक्के अशी तरतूद केली जाते. राज्यकर्त्यांनी त्यांची इच्छाशक्ती दाखवून त्यासाठी पावले उचलावी.- अ‍ॅड. जयंत जायभावे, माजी अध्यक्ष, महा. गोवा बार कौन्सिलजलदगतीने होईल खटल्यांचा निपटाराअर्थसंकल्पात विधी क्षेत्रासाठी ०.५ टक्के एवढीच तरतूद यापूर्वी केली गेली आहे. ८ टक्क्यांपर्यंत न्यायव्यवस्थेसाठी तरतूद करणे गरजेचे आहे. न्यायाधीशांची कमी संख्या हा संपूर्ण देशाला भेडसावणारा प्रश्न आहे. परदेशांमध्ये एक हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे, तर भारतात १५ हजारांमागे एक न्यायाधीश आहे. त्यामुळे जलदगतीने खटल्यांचा निपटारा होत नाही. अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे आहे.-अ‍ॅड. अविनाश भिडे, माजी अध्यक्ष, महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलन्यायव्यवस्थेसाठी तरतूद अत्यंत तोकडीन्यायव्यवस्थेमार्फत सरकारला मोठा महसूल मिळतो. देशातन्यायाधीशांची तोकडी संख्या आहे. आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे न्यायाधीशांची संख्या वाढत नाही.अर्थसंक ल्पात दोन टक्क्यांपर्यंत तरतूद असावी. त्याचबरोबर वकिलांसाठी अद्ययावत रिफ्रेशमेंटकोर्सेस सुरू करता येऊ शकेल. तसेच ज्युनिअर वकिलांना मानधन सर्व राज्यांमध्ये सुरू करण्याबाबतही विचार होणेगरजेचे आहे.-अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असो.दोन टक्क्यांपर्यंत तरतूद गरजेचीन्यायालयात खटल्यांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी न्यायालये आणि न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असणे गरजेचे आहे. किमान पावणेदोन ते दोन टक्के इतकी तरतूद झाल्यास मोठा फरक पडेल. न्यायाधीशांची संख्या वाढल्यास जलदगतीने प्रलंबित खटल्यांचा निपटारा होईल.- अजय मिसर, विशेष सरकारी वकीलअर्थसंकल्पात हवी भरीव तरतूदसर्वोच्च न्यायालयानेदेखील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याकडे लक्ष वेधले आहे. येण्याºया अर्थसंकल्पामध्ये सरकारने न्यायव्यवस्थेसाठी सरकारने योग्य ती तरतूद केल्यास न्यायालयाच्या जुन्या इमारतींमध्ये सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा होईल. भौतिक सोयीसुविधांची चणचण भासणार नाही.- अ‍ॅड. विद्या देवरे-निकम, सरकारी वकीलअर्थसंकल्पाकडून अपेक्षा

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक