शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

न्यायव्यवस्थेसाठी चार टक्क्यांपर्यंत तरतूद हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:54 IST

अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे.

नाशिक : अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे.भारतात पंधरा हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे. विदेशांमध्ये एक हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे. न्यायाधीश, न्यायालयांच्या अपुऱ्या संख्येमुळे खटल्यांचा निपटारा होण्यास देशात विलंब लागतो. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेला अधिकाधिक सोयी-सुविधा पुरवून बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून दोन ते चार टक्क्यांपर्यंत तरतूद होणे गरजेचे असल्याचे मत शहरातील विधीज्ञांनी व्यक्त केले....तर वाढेल न्यायाधीशांची संख्यातरतूद अत्यल्प असल्यामुळे न्यायाधीशांची संख्या अपुरी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात दोन टक्क्यांपर्यंत तरतूद गरजेची आहे. दहा लाख लोकांमागे ५० न्यायाधीश असावे, असा ठराव झाला आहे. अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेवर १० टक्के खर्च करावा, अशी घटना सांगते. प्रत्यक्षात आतापर्यंत ०.१९ ते ०.२३ टक्के अशी तरतूद केली जाते. राज्यकर्त्यांनी त्यांची इच्छाशक्ती दाखवून त्यासाठी पावले उचलावी.- अ‍ॅड. जयंत जायभावे, माजी अध्यक्ष, महा. गोवा बार कौन्सिलजलदगतीने होईल खटल्यांचा निपटाराअर्थसंकल्पात विधी क्षेत्रासाठी ०.५ टक्के एवढीच तरतूद यापूर्वी केली गेली आहे. ८ टक्क्यांपर्यंत न्यायव्यवस्थेसाठी तरतूद करणे गरजेचे आहे. न्यायाधीशांची कमी संख्या हा संपूर्ण देशाला भेडसावणारा प्रश्न आहे. परदेशांमध्ये एक हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे, तर भारतात १५ हजारांमागे एक न्यायाधीश आहे. त्यामुळे जलदगतीने खटल्यांचा निपटारा होत नाही. अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे आहे.-अ‍ॅड. अविनाश भिडे, माजी अध्यक्ष, महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलन्यायव्यवस्थेसाठी तरतूद अत्यंत तोकडीन्यायव्यवस्थेमार्फत सरकारला मोठा महसूल मिळतो. देशातन्यायाधीशांची तोकडी संख्या आहे. आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे न्यायाधीशांची संख्या वाढत नाही.अर्थसंक ल्पात दोन टक्क्यांपर्यंत तरतूद असावी. त्याचबरोबर वकिलांसाठी अद्ययावत रिफ्रेशमेंटकोर्सेस सुरू करता येऊ शकेल. तसेच ज्युनिअर वकिलांना मानधन सर्व राज्यांमध्ये सुरू करण्याबाबतही विचार होणेगरजेचे आहे.-अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असो.दोन टक्क्यांपर्यंत तरतूद गरजेचीन्यायालयात खटल्यांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी न्यायालये आणि न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असणे गरजेचे आहे. किमान पावणेदोन ते दोन टक्के इतकी तरतूद झाल्यास मोठा फरक पडेल. न्यायाधीशांची संख्या वाढल्यास जलदगतीने प्रलंबित खटल्यांचा निपटारा होईल.- अजय मिसर, विशेष सरकारी वकीलअर्थसंकल्पात हवी भरीव तरतूदसर्वोच्च न्यायालयानेदेखील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याकडे लक्ष वेधले आहे. येण्याºया अर्थसंकल्पामध्ये सरकारने न्यायव्यवस्थेसाठी सरकारने योग्य ती तरतूद केल्यास न्यायालयाच्या जुन्या इमारतींमध्ये सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा होईल. भौतिक सोयीसुविधांची चणचण भासणार नाही.- अ‍ॅड. विद्या देवरे-निकम, सरकारी वकीलअर्थसंकल्पाकडून अपेक्षा

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक