शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

मुंढे होते तेव्हा बरे होते... आता परिस्थिती बिघडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:46 IST

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला.

पंचवटी : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. प्रभाग बैठकीत विषय येत नसतील तर प्रभाग बैठका घेऊ नका, अशा शब्दात प्रशासनाला खडसावून कामे होत नसल्याचे खापर फोडले.  प्रभागाची बैठक सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२४) संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी तीन ते पाच लाखांच्या कामांचे विषय विषयपत्रिकेवर घ्यावे. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने सदस्यांच्या अधिकारावर गदा आलेली आहे. मनपाच्या सर्वच शाळांतील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. कुठे दरवाजे तुटले तर कुठे पाणी नाही, स्वच्छता नाही, बांधकाम, विद्युत तसेच संबंधित विभागाने तत्काळ पाहणी दौरा करून दखल घ्यावी तसेच मनपा शाळेत अ‍ॅक्वा गार्ड व पाण्याच्या टाक्या बसवाव्यात, अशी सूचना केली.विषयपत्रिकेवर विषय येत नसल्याने बैठक घेणे निरुपयोगी ठरत आहे. दिंडोरीरोडवरील तारवालानगरला गतिरोधक प्रश्न अजूनही प्रलंबित असून मनपाने त्याठिकाणी रंबलर आणि कॅट आय बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जगदीश पाटील यांनी केली. फुलेनगरला पथदीप बंद असल्याचे शांता हिरे यांनी सांगितले. तर आडगाव येथील मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. विषयपत्रिकेवर विषय येत नसतील तर प्रभाग सभा कशासाठी असा सवाल शीतल माळोदे यांनी केला. अमृतधाम येथे शौचालयाची स्वच्छता होत  नाही.हिरावाडीतील कालिकानगरला उभारलेल्या रुग्णालयात डॉक्टरही नाही आणि औषधही मिळत नसल्याची तक्रार पूनम मोगरे, रुची कुंभारकर यांनी केली तर प्रभागातील अनेक नागरिकांना घरटपट्टी तसेच पाणीपट्टीची देयके मिळत नसल्याचे प्रियंका माने यांनी सांगितले. मनपा तत्कालीन आयुक्त मुंढे यांची बदली झाली खरी, मात्र त्यानंतर प्रशासनावर वचक राहिलेला नाही शिवाय मुंढे होते त्यावेळी परिस्थिती ठीक होती, आता परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. बैठकीत झालेल्या चर्चेत पुंडलिक खोडे, हेमंत शेट्टी, सुरेश खेताडे, सरिता सोनवणे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, संजय दराडे, राहुल खांदवे, आर. एस. पाटील आदींनी सहभाग घेतला होता.मनपा शाळांमध्ये सुरक्षारक्षक वाढवावेमहापालिकेच्या शाळांत सुरक्षारक्षक नसल्याने शाळांची दुरवस्था झालेली आहे. नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयात अनेक सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. महापालिकेला कोण खाते, तेथील सुरक्षारक्षकांची संख्या कमी करून तेच सुरक्षारक्षक मनपाच्या शाळेत नेमले तर शाळांची सुरक्षितता व देखभाल व्यवस्थित राहील.- अशोक मुर्तडक, माजी महापौर

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे