शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नाशिक महापालिकेला आत तरी बस सेवा चालवणे शक्य आहे काय?

By संजय पाठक | Updated: October 16, 2020 02:20 IST

ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा  हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयांचीजाणिव कधी कधी विलंबाने होते, तसेच आता झाले आहे. ज्या भाजपाने ही सेवासुरू करण्यावर भर दिला त्याच पक्षाच्या गटनेत्याला आता ही सेवा चालवतायेणे शक्य नसल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी तसे पत्र दिले आहे.देर आये, दुरूस्त आये असे मान्य  केले तर आता तरी महापालिकेने बस सेवेचापांढरा हत्ती खरोखरीच पोसणे शक्य आहे काय याचा विचार करण्याची गरजनिर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देआर्थिक ताण वाढलातोट्यात पडले तर नागरी सेवांना फटका

नाशिक- ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा  हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयांचीजाणिव कधी कधी विलंबाने होते, तसेच आता झाले आहे. ज्या भाजपाने ही सेवासुरू करण्यावर भर दिला त्याच पक्षाच्या गटनेत्याला आता ही सेवा चालवतायेणे शक्य नसल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी तसे पत्र दिले आहे.देर आये, दुरूस्त आये असे मान्य  केले तर आता तरी महापालिकेने बस सेवेचापांढरा हत्ती खरोखरीच पोसणे शक्य आहे काय याचा विचार करण्याची गरजनिर्माण झाली आहे. 

१९९२ मध्ये नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यापासूनआत्तापर्यंत सहा वेळा नाशिक महापालिकेने शहर बस वाहतुक सुरू करण्यासाठीराज्य परिवहन महामंडळाने प्रयत्न केले. परंतु त्यावेळी ज्यांचा विरोधहोता तेच मात्र राज्यात आणि नाशिक महापालिकेत सत्तेत आल्यानंतर ही सेवासुरू करण्यास सरसावले. राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना सरकारचेदायीत्व आणि सार्वजनिक उद्योगांची जबाबदारी कमी करण्यासाठी नाशिकमहापालिकेच्या गळ्यात ही सेवा मारली.

खरे तर अनेकदा विरोध करणा-यांनानव्या काळात  बस सेवेपेक्षा अन्य लाभ अधिक खुणावत असल्यानेच ही सेवास्विकारण्यासाठी सर्वच जण तयार झाले.काहींचा लटका विरोध होता इतकेच.मात्र, अनेकांना ज्या परिवहन समितीच्या माध्यमातून स्थायी समितीलापर्यायी आर्थिक लाभाची यंत्रणा उभारायचे ठरवले, त्यावर तत्कालीन आयुक्ततुकाराम मुंढे  यांनी पाणी फेरले आणि नाशिक परीवहन कंपनी काढली. अर्थातकंपनीचा पर्याय खूप चांगला आहे, असे नाही. सध्या स्मार्ट सिटी कंपनीचे जेनवनविन पराक्रम बाहेर येत आहेत,ते बघता परिवहन कंपनी वेगळे  काही करेलअसे वाटत नाही.नाशिक महापालिकेने चारशे बस घेऊन ही सेवा सुरू करण्याचे ठरवले आणित्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, मुळातच महापालिकेची हीबंधनात्मक जबाबदारी नाही. तसे महाराष्ट्रप्रांतीक अधिनियमात देखील नमूदके ले आहे. त्यातच ही सेवा तोट्यातच चालणार हे वैश्विक सत्य आहे.त्यामुळे नाशिक महापालिकेला वर्षाकाठी किमान पन्नास कोटींची तुट सोसावीलागणार आहे.महापालिकेवर सध्या रस्ते,पाणी, गटारी आणि अनेक कामांचेदायित्व आहे. शहर बस वाहतूकीसाठी तोट्याची परत फेड करण्यासाठी निधी धरलातर रस्ते, पाणी, आरोग्य, दिवाबत्ती या सर्वच कामांवर त्याचा परीणाम होणारआहे. त्यातच शासनाकडून महापालिकेवर अनेक कामे सोपवली जात आहेत.अनेकयोजनांमध्ये निधीची तरतूद करावी लागत आहे. प्रत्येक गोष्ट कंत्राटीपध्दतीने करताना नाशिक शहरात साधे सफाई कामगार भरण्याचा ठेका ७७ कोटींवरगेला तर डास मारण्याचा ठेका ४७ कोटींवर गेला होता. अशावेळी बस सेवाचालवणे हे कोणत्याही स्थितीत योग्यच नाही. परंतु महापालिका यातून मागेहटेल काय हा प्रश्न आहे.काहींना हा कायदेशीर अडचणीचा विषय वाटत असला तरीअजून ही सेवा सुरू होत नाही तो पर्यंत ही अखेरची संधी आहे, हे जाणूनघेतले पाहिजे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका