शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची लेखा परिक्षकाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:16 PM

ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्असून,

ठळक मुद्देऊस उत्पादकांची तक्रार : शासनाकडून तातडीने दखलभ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षापासून कारखाना बंद

नाशिक : महाराष्टÑातील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षापासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या लागत असल्याने कारखान्याच्या या सा-या परिस्थितीस जबाबदार असलेल्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय साखर सहसंचालकांनी घेतला असून, तसे आदेश त्यांनी विशेष लेखा परिक्षकास दिले आहेत.या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्असून, दिड हजार कारखाना कर्मचाºयांची उपासमार होत आहेत तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे उत्पादन बंद झाले आहे. ३५ हजार सभासदांचे करोडे रूपयांचे भाग भांडवल बुडीत झाले आहे. कारखान्यावर ३०० कोटी रूपयांचा बोझा झालेला आहे. या सर्व गोष्ष्टींचा परिणाम म्हणून कारखाना परिसरातील ५४ शेतक-यांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. या सा-या बाबींना त्या त्या वेळचे कारखान्याचे संचालक व अधिकारी जबाबदार आहेत. निफाड कारखान्याची ऊस क्षेत्राची उपलब्धता विचारात घेता निसाकाया गाळप क्षमता प्रतिदिन १२०० टनावरून ४००० टन करणे उपयुक्त व व्यवहार्य होते काय? याची चौकशी करावी, गाळप क्षमता वाढविण्यासाठी मशिनरी व सामग्री खरेदी नियमानुसार झाली काय? गाळप क्षमता वाढविल्यामुळे पुरेसा ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखाना दररोज चार तास नो केन होत होता त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्यांची चौकशी व्हावी, निसाका इतकी गाळप क्षमता असलेल्या खासगी कारखान्यात ४०० कर्मचारी काम करतात तर निसाकात १५०० कामगारांचीआवश्यकता होती काय? निसाकाने सन २००८ ते २०१२ या कालावधीत ८५० ते ९०० प्रति क्विंटल दराने साखरेची विक्री केली त्याच वेळी साखरेचा दर २७०० ते ३००० प्रति क्विंटल इतका झाला होता त्यामुळे कारखान्याला १०० कोटीचा फटका बसला या साखर घोटाळ्याची चौकशी करावी, सन २००३ ते २००६ या कालावधीत चेकने साखर विक्री करण्यात आली, त्यातील अनेक चेक न वटताच परत आले व कारखान्याचे नुकसान झाले त्यास जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक