शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उत्तर महाराष्टतील उद्योजकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:47 AM

उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकलाही सवलत कधी देणार, असा प्रश्न या निमित्ताने उद्योजकांनी केला आहे.मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात सवलत दिली आहे. अशीच सवलत नाशिकमधील उद्योजकांनाही मिळावी, अशी आग्रही मागणी गेल्या तीन वर्षांपासून उद्योजक करीत आहेत. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निमा पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट घेऊन सवलतीची मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही मागणी सपशेल फेटाळून लावली आहे. नाशिकमधील भाजपाचे आमदारांनादेखील बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. परंतु उपयोग झालेला नाही. ही मागणी कायम असताना मंगळवारी (दि.२८) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भ, मराठवाड्याला वीज दरातील सवलत पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती समजताच उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विदर्भ व मराठवाड्याला सवलत देण्यास हरकत नाही. हीच सवलत नाशिकलाही देण्यात यावी, अशी मागणी आहे. राज्यातील उद्योजकांना विजेचे दर वेगवेगळे का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सापत्नभावाची वागणूक देऊ नये, अशाही भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसी