शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला कळवण विभागात सुरुवात

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

ग्राहकांकडे ३६ कोटी दहा लाख थकबाकी

कळवण : कृषी ग्राहकांवरील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्याकरिता कृषी संजीवनी योजना सुरु केली असून, ही योजना कळवण विभागात लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कळवण विभागातील शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे कळवण उपविभागाचे सहाय्यक अभियंता किरण जाधव यांनी केले आहे.
कळवण व देवळा तालुक्यातील २५ हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असला तरी या वर्षी शेतकरी वर्गावर आलेल्या अस्मानी-सुलतानी संकटामुळे व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने या योजनेला शेतकरी वर्गाकङून कितपत प्रतिसाद मिळतो यावर योजनेचे कळवण विभागात भवितव्य अवलंबून आहे.
योजनेमुळे विभागातील लाखो रुपयांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांनी त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या थकबाकीतील मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व थकीत व्याज व दंड माफ होणार आहे. तीन हप्त्यांत शेतकरी थकबाकीची रक्कम भरू शकणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता वीस टक्के ३१ आॅगस्टपर्यंत दुसरा हप्ता कमीत कमी २० टक्के ३० सप्टेंबरपर्यंत व उरलेली रक्कम ३१ आॅक्टोंबरपर्यंत भरायची आहे. कळवण व देवळा तालुक्यांतील कृषी ग्राहक २५ हजार ८४४ असून, त्यांच्याकडील थकबाकी ३६ कोटी दहा लाख रुपये आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एल.टी.ठाकूर यांनी केले आहे.
(वार्ताहर)