शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:35 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.

ठळक मुद्देवटार : ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात; आर्थिक नियोजन कोलमडले

ओतूरला कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी करताना शेतकरी.वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. हे पीक तीन ते चार महिन्यात येत असल्याने नगदी पीक म्हणून याकडे शेतकरी पाहतात. चालूवर्षी सुरुवातीपासून चांगला बाजारभाव असल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बदलते हवामान पिच्छा सोडण्यास तयार नाही, परिणामी महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा आहे.कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकली जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती; पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वाळणे असेअनेक रोग येत असून, महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.पाच-सहा वर्षांपासून वरु णराजा रुसला होता. परिणामी परिसरात पाण्याचे मोठे संकट होते; पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहू, हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, वातावारणाचा फटका गव्हालाही बसत असून, विविध रोगाने गव्हाला ग्रासले आहे तर हरभरा पिकाला ऐन गाठे भरण्याच्या वेळेस अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यावर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसा उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता; पण व्याजाने व उसनावर पैसे घेऊन रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली खरी; पण बदलत्या हवामानामुळे शेतकº्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.महागड्या औषधांची फवारणीमहागडी औषधांची कांद्यावर फवारणी करीत आहे. या रोगराईमुळे यावर्षी कांद्याचं उत्पादन घटणार आहे. दरवर्षी ओतूर परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीस व रोगराई अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा उशिराने कांदा लागवड होत आहे. त्यातच ओतूर धरणाच्या पाणी गळतीमुळे फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडते. परिणामास विहिरींचे पाणी तळ गाठते चालूवर्षी चांगला पाऊसझाल्याने मार्च महिन्यापर्यंत थंडी राहील व पाणीही टिकेल, अशी आशा वाटते. मजूर टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. बºयाच शेतकऱ्यांनी बाहेरगावांहून मजूर आणून लागवड ठेका पद्धतीने केली आहे. कांद्याला चांगले दर असल्याने महागडी रोपे आणूनही यंदा कांदा लागवडीत दरवर्षापेक्षा घट झाली आहे.ओतूर परिसरातील शेतकरी हैराण४ओतूर : परिसरात ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन कांदा पिकावर करपा व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे. यावर्षी दोन -तीन वेळा उन्हाळ कांद्याची रोपे टाकूनही अवकाळी पावसामुळे ती खराब होऊन वाया गेली. त्यामुळे थोडीफार जगवलेलीरोपे व इतर ठिकाणांहून विकत आणलेली महागडी रोपे घेत कशीबशी लागवड केली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सकाळी पडणारे धुके व दवबिंदू यामुळे करपा व भुरी रोगाने थैमान घातले आहे.माझा दोन एकर कांदा लागवड करून दोन महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भात होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत जर बघितली तर शेती हासुद्धा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील का नाही याचा भरोसा नाही.- हरिष खैरनार, कांदा उत्पादक वटार

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा