शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:35 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.

ठळक मुद्देवटार : ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात; आर्थिक नियोजन कोलमडले

ओतूरला कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी करताना शेतकरी.वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. हे पीक तीन ते चार महिन्यात येत असल्याने नगदी पीक म्हणून याकडे शेतकरी पाहतात. चालूवर्षी सुरुवातीपासून चांगला बाजारभाव असल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बदलते हवामान पिच्छा सोडण्यास तयार नाही, परिणामी महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा आहे.कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकली जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती; पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वाळणे असेअनेक रोग येत असून, महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.पाच-सहा वर्षांपासून वरु णराजा रुसला होता. परिणामी परिसरात पाण्याचे मोठे संकट होते; पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहू, हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, वातावारणाचा फटका गव्हालाही बसत असून, विविध रोगाने गव्हाला ग्रासले आहे तर हरभरा पिकाला ऐन गाठे भरण्याच्या वेळेस अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यावर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसा उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता; पण व्याजाने व उसनावर पैसे घेऊन रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली खरी; पण बदलत्या हवामानामुळे शेतकº्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.महागड्या औषधांची फवारणीमहागडी औषधांची कांद्यावर फवारणी करीत आहे. या रोगराईमुळे यावर्षी कांद्याचं उत्पादन घटणार आहे. दरवर्षी ओतूर परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीस व रोगराई अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा उशिराने कांदा लागवड होत आहे. त्यातच ओतूर धरणाच्या पाणी गळतीमुळे फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडते. परिणामास विहिरींचे पाणी तळ गाठते चालूवर्षी चांगला पाऊसझाल्याने मार्च महिन्यापर्यंत थंडी राहील व पाणीही टिकेल, अशी आशा वाटते. मजूर टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. बºयाच शेतकऱ्यांनी बाहेरगावांहून मजूर आणून लागवड ठेका पद्धतीने केली आहे. कांद्याला चांगले दर असल्याने महागडी रोपे आणूनही यंदा कांदा लागवडीत दरवर्षापेक्षा घट झाली आहे.ओतूर परिसरातील शेतकरी हैराण४ओतूर : परिसरात ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन कांदा पिकावर करपा व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे. यावर्षी दोन -तीन वेळा उन्हाळ कांद्याची रोपे टाकूनही अवकाळी पावसामुळे ती खराब होऊन वाया गेली. त्यामुळे थोडीफार जगवलेलीरोपे व इतर ठिकाणांहून विकत आणलेली महागडी रोपे घेत कशीबशी लागवड केली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सकाळी पडणारे धुके व दवबिंदू यामुळे करपा व भुरी रोगाने थैमान घातले आहे.माझा दोन एकर कांदा लागवड करून दोन महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भात होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत जर बघितली तर शेती हासुद्धा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील का नाही याचा भरोसा नाही.- हरिष खैरनार, कांदा उत्पादक वटार

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा