शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पाण्याचे आवर्तन वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:01 AM

मालेगाव शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.

ठळक मुद्देमौलाना मुफ्ती मो. इस्माईल : कालवा सल्लागार समितीची बैठक

मालेगाव : शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आमदार मुफ्ती यांनी हद्दवाढीत समाविष्ट सात गावांमुळे मालेगावची लोकसंख्या सुमारे साडेसात लाखांच्या झाली आहे. वाढती लोकसंख्या पाहता मिळणारे पाणी शहराला कमी पडत आहे. गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दलघफू आहे. मालेगावसाठी ९०० दलघफू पाणी मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात ६०० दलघफू पाणी मिळत आहे.परिणामी शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे ४०० दलघफू पाणी वाढवून ते किमान एक हजार एमसीएफटीकरावे. चणकापूर धरणातून १६०० दलघफूची मागणी असताना केवळ १४०० एमसीएफटी पाणी दिले जाते. जुलै २०२० पर्यंत चार आवर्तनांची मंजुरी आहे. पाणीटंचाईचाविचार करता एक आवर्तन वाढून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली.तळवाडे साठवण तलावाची क्षमता वाढली तरी हे पाणी केवळ ७० ते ७५ दिवसच पुरते. पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.भायगाव, सोयगाव, कलेक्टरपट्टा, द्याने, म्हाळदे, दरेगाव, सायने ही सात गावे २०११ ला महापालिकेत समाविष्ट झाली. लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा वापर व मागणी वाढत आहे. चणकापूरची २० किलोमीटर अंतराची जलवाहिनी ४० वर्षे जुनी आहे. परिणामी अनेक ठिकाणी पाणीगळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. या सर्व बाबींचा विचार करून वाढीव पाणी देण्यास मंजुरी देत नवीन जलवाहिनीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात