शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अपघातप्रवण क्षेत्रात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:48 IST

देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराची बस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.

ठळक मुद्देदेवळा : १८ वर्षांपूर्वी भावडघाटात बस कोसळल्याची आठवण ताजी

देवळा : तालुक्यात देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराचीबस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.एवढे अपघात होऊनही तालुक्यातील अपघातप्रवण क्षेत्रात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात भावडघाट ते देवळा, देवळा-कळवण रस्त्यावरील भऊरफाटा, देवळा- सटाणा रस्त्यावर माळवाडी फाटा व देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी व मेशी फाट्याजवळ असलेला वळण रस्ता हे सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक अपघात झालेले आहेत. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व अपघातप्रवण क्षेत्रात आवश्यक तेथे वाहनचालकांना सूचित करणारे सूचनाफलक लावण्याची तसेच या सर्व अपघातप्रवण वळण रस्त्यांचे विस्तारीकरण व मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.तीव्र उतारामुळे वाहने सुटतात सुसाटविंचूर प्रकाशा (राज्यमार्ग क्र .७) या मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते देवळा शहर या सुमारे १० कि.मी. अंतरात झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. भावडघाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट येतात, यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच ओव्हरटेक करताना अनेक अपघात झाले आहेत. भावडघाटाच्या पायथ्याशी असलेला वळण रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. या मार्गाचे त्वरित विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्र मण करतात, फलक लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते. डांबरी रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. त्याची योग्य ती डागडुजी करीत नाहीत. त्या जागेवरील डांबर उखडल्यानंतर नवीन डांबर, खडी आदी टाकले जात नाही. यामुळे खड्डे पडून रस्त्यांचे नुकसान होते व अपघाताची शक्यता वाढते. या गोष्टीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या बाबी सर्रास सुरू असतात.रस्त्याच्या दुरुस्तीचा नुसताच सोपस्कारगतवर्षी देवळा-मालेगाव रस्त्यावरील खुंटेवाडी फाट्यावर यावल आगाराच्या सप्तशृंगगडावरून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला होता, त्यात ३९ भाविक जखमी झाले होते. वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरु स्ती करण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ही दुरु स्ती करताना गुणवत्ता राखली जाते का? हा एक मोठा प्रश्नच आहे, कारण दुरु स्तीनंतर महिनाभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात