शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अपघातप्रवण क्षेत्रात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:48 IST

देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराची बस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.

ठळक मुद्देदेवळा : १८ वर्षांपूर्वी भावडघाटात बस कोसळल्याची आठवण ताजी

देवळा : तालुक्यात देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराचीबस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.एवढे अपघात होऊनही तालुक्यातील अपघातप्रवण क्षेत्रात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात भावडघाट ते देवळा, देवळा-कळवण रस्त्यावरील भऊरफाटा, देवळा- सटाणा रस्त्यावर माळवाडी फाटा व देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी व मेशी फाट्याजवळ असलेला वळण रस्ता हे सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक अपघात झालेले आहेत. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व अपघातप्रवण क्षेत्रात आवश्यक तेथे वाहनचालकांना सूचित करणारे सूचनाफलक लावण्याची तसेच या सर्व अपघातप्रवण वळण रस्त्यांचे विस्तारीकरण व मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.तीव्र उतारामुळे वाहने सुटतात सुसाटविंचूर प्रकाशा (राज्यमार्ग क्र .७) या मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते देवळा शहर या सुमारे १० कि.मी. अंतरात झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. भावडघाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट येतात, यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच ओव्हरटेक करताना अनेक अपघात झाले आहेत. भावडघाटाच्या पायथ्याशी असलेला वळण रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. या मार्गाचे त्वरित विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्र मण करतात, फलक लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते. डांबरी रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. त्याची योग्य ती डागडुजी करीत नाहीत. त्या जागेवरील डांबर उखडल्यानंतर नवीन डांबर, खडी आदी टाकले जात नाही. यामुळे खड्डे पडून रस्त्यांचे नुकसान होते व अपघाताची शक्यता वाढते. या गोष्टीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या बाबी सर्रास सुरू असतात.रस्त्याच्या दुरुस्तीचा नुसताच सोपस्कारगतवर्षी देवळा-मालेगाव रस्त्यावरील खुंटेवाडी फाट्यावर यावल आगाराच्या सप्तशृंगगडावरून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला होता, त्यात ३९ भाविक जखमी झाले होते. वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरु स्ती करण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ही दुरु स्ती करताना गुणवत्ता राखली जाते का? हा एक मोठा प्रश्नच आहे, कारण दुरु स्तीनंतर महिनाभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात