शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रवण क्षेत्रात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:48 IST

देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराची बस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.

ठळक मुद्देदेवळा : १८ वर्षांपूर्वी भावडघाटात बस कोसळल्याची आठवण ताजी

देवळा : तालुक्यात देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराचीबस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.एवढे अपघात होऊनही तालुक्यातील अपघातप्रवण क्षेत्रात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात भावडघाट ते देवळा, देवळा-कळवण रस्त्यावरील भऊरफाटा, देवळा- सटाणा रस्त्यावर माळवाडी फाटा व देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी व मेशी फाट्याजवळ असलेला वळण रस्ता हे सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक अपघात झालेले आहेत. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व अपघातप्रवण क्षेत्रात आवश्यक तेथे वाहनचालकांना सूचित करणारे सूचनाफलक लावण्याची तसेच या सर्व अपघातप्रवण वळण रस्त्यांचे विस्तारीकरण व मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.तीव्र उतारामुळे वाहने सुटतात सुसाटविंचूर प्रकाशा (राज्यमार्ग क्र .७) या मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते देवळा शहर या सुमारे १० कि.मी. अंतरात झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. भावडघाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट येतात, यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच ओव्हरटेक करताना अनेक अपघात झाले आहेत. भावडघाटाच्या पायथ्याशी असलेला वळण रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. या मार्गाचे त्वरित विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्र मण करतात, फलक लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते. डांबरी रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. त्याची योग्य ती डागडुजी करीत नाहीत. त्या जागेवरील डांबर उखडल्यानंतर नवीन डांबर, खडी आदी टाकले जात नाही. यामुळे खड्डे पडून रस्त्यांचे नुकसान होते व अपघाताची शक्यता वाढते. या गोष्टीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या बाबी सर्रास सुरू असतात.रस्त्याच्या दुरुस्तीचा नुसताच सोपस्कारगतवर्षी देवळा-मालेगाव रस्त्यावरील खुंटेवाडी फाट्यावर यावल आगाराच्या सप्तशृंगगडावरून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला होता, त्यात ३९ भाविक जखमी झाले होते. वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरु स्ती करण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ही दुरु स्ती करताना गुणवत्ता राखली जाते का? हा एक मोठा प्रश्नच आहे, कारण दुरु स्तीनंतर महिनाभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात