शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

‘निसर्ग’ वादळाचा शहरासह जिल्ह्यात प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 6:38 PM

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर ...

ठळक मुद्देसंध्याकाळपर्यंत वा-याच्या वेगात वाढजिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल सज्ज ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर धडकणार आहे. सध्या नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात चक्रीवादळाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. शहरात वादळाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरीदेखील पावसाच्या सरी दिवसभर कोसळत असून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १७ मि.मी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात वाऱ्याचा वेग दूपारच्या तुलनेत आता वाढलेला दिसून येत असून ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहे.शहरात आज दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरींचा वर्षाव सुरूच आहे. पहाटेपासून दूपारपर्यंत वारे ताशी १५ ते २० किमी वेगाने वाहत होते. हळुहळु संध्याकाळपर्यंत वा-याच्या वेगात वाढ होत गेली.दिवसभरात पावसाने शहरात चांगलीच हजेरी लावली. वा-याचा वेग कमी-अधिक होत होता. अग्निशमन दलाच्या जवानांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाचे मुख्यालय तसेच सर्व उपकेंद्रांवर जवान आवश्यक त्या साधनसामुग्रीने सज्ज आहेत. दिवसभरात किरकोळ अपघाताच्या घटना शहरात घडल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, नाशिक कडे संध्याकाळी वादळाने आपली दिशा केल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या इशारा देण्यात आला.काठे गल्लीतील गणेशनगर उद्यानासमोरील मोठा बॉटल पाम वृक्ष कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी काठेगल्लीत पोहचून वृक्षाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. वाºयाचा वेग संध्याकाळनंतर वाढल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडण्यास शहरात सुरूवात झाली आहे. शहरात परदेशी प्रजातीची ठिसूळ वृक्षांची संख्या मोठी असल्याने वादळाचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर सोसाट्याचा वारा शहरात वाहू शकतो आणि या वादळी वाºयाने अशी ठिसूळ झाडे मोठ्या संख्येने उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आज दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू होता. काही भागांमध्ये वीजतारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला तर कोठे झाडांच्या फांद्या तुटून विजवाहिन्यांवर आल्याने वीजपुरवठा बाधित झाला. काही उपनगरांमध्ये दोन ते तीन तास तर काही भागांमध्ये तासभर वीज गायब राहिली. महावितरण कंपनीच्या वायरमन कर्मचाऱ्यांनी भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावून चोख कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल