शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'असल्या' दुर्लक्षामुळेच संकटाच्या गंभीरतेत होतेय वाढ !

By किरण अग्रवाल | Updated: April 4, 2021 00:54 IST

कोरोनाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा राब राब राबत आहे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून त्यांची प्रयत्नांची शर्थ सुरू आहे; पण दुसरीकडे काही घटक मात्र अजूनही बेफिकिरीने वागताना दिसून येतात, ज्याचा फटका सामान्यांना बसणे स्वाभाविक ठरून जाते.

ठळक मुद्देयंत्रणांमधील काहींच्या बेफिकिरीचा आणखी कोणता पुरावा हवा?उत्सवी भेटी बंद करून सुविधा पुरवा...व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात वापराविना नॉनकोविड वॉर्डात पडून

सारांशनाशिक महानगर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना व्यवस्थेतील अव्यवस्था कशी असू शकते याचा दाहक अनुभव सध्या या संकटाशी झगडणारे नाशिककर घेत आहेत. जिल्हा रूग्णालयात अनेक व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याची उघडकीस आलेली बाब म्हणूनच गंभीर ठरावी.कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे व सुविधाही उपलब्ध आहेत, असा दावा संबंधितांकडून केला जात असतानाच नाशकात ऑक्सिजनची गरज असलेल्या दोन रुग्णांना खासगी व सरकारी रुग्णालयातदेखील बेड मिळू न शकल्याने अखेर ऑक्सिजन सिलिंडरसह महापालिकेच्या दारात आंदोलनाला यावे लागले. सदर प्रकार गैर होता व रुग्णाच्या जिवाशी खेळणारा होता हे खरे व यातून एका रुग्णाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटनाही घडली; परंतु अशी वेळ यावीच कशाला, हा यातील खरा प्रश्न आहे. अत्यवस्थ रुग्णांचे नातेवाईक घायकुतीला आल्याप्रमाणे गावभर फिरफिर फिरत आहेत, पण त्यांना बेड्स मिळत नसतील तर त्यातून भय वाढीस लागणारच.महत्त्वाचे म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आलेले व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात वापराविना नॉनकोविड वॉर्डात पडून असल्याची बाब पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघडकीस आली, याकडे संबंधितांच्या गांभीर्याच्या अभावाचा कडेलोट म्हणून पाहता यावे. याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे खरे; परंतु सुविधा असूनही त्याचा वापर करू न शकणार्‍या व पर्यायाने सरकारी व्यवस्थांवरील टीकेस सामोरे जाण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जबाबदार घटकांचे अशा जुजबी शिक्षेवर निभावता कामा नये. याच आरोग्य यंत्रणेतील अन्य घटक सुट्या व रजा न घेता अतिशय परिश्रमाने सेवारत असताना जबाबदार घटक मात्र त्यांची जबाबदारी पार पाडणार नसतील तर वरिष्ठ यंत्रणेने अशा बाबींकडे गांभीर्यानेच पाहायला हवे.यंत्रणांची व त्याचे नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी यासंदर्भात अधिक यासाठी आहे, की एकतर तळातील सहकारी परिश्रम घेत असताना त्यांना पुरवावयाच्या सुविधांबाबत काणाडोळा होत असेल तर ते समर्थनीय ठरू नये. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही, त्यामुळे त्यांना काम बंद करण्याचा इशारा देण्याची वेळ येत असेल तर ते योग्य नाही. आता ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे. रुग्णालयांमध्येच नव्हे तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनाही घरी सिलिंडर मिळत नसल्याने ओरड होऊ लागली आहे. अशावेळी याबाबतच्या पुरवठ्याबाबत काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. महापालिकेच्या विविध विभागातील रुग्णालयांमधील असुविधा व साधनांची अपूर्णताही वेळोवेळी पुढे आली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी त्याबद्दल घसा ओरडून तक्रार केली आहे, तेव्हा डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबाय आदी घटक जीव तोडून झटत असताना त्यांना किमान सुविधा पुरवल्या जायलाच हव्या. शेवटी तीदेखील आपलीच माणसे आहेत, त्यांनाही जीव आहे. त्यांची फिकीर आपण नाही बाळगायची तर कोण बाळगणार?उत्सवी भेटी बंद करून सुविधा पुरवा...यंत्रणांमधील अव्यवस्था जेव्हा पुढे येऊ लागते तेव्हा तेथे भेटी देऊन सूचना करणाऱ्यांचे प्रकार वाढीस लागतात. काही बाबतीत वा प्रसंगी ते बरेही असते, पण ज्यावेळी आरोग्यविषयक समस्या असते आणि यंत्रणेवर प्राथमिकतेने रुग्ण हाताळायचा ताण असतो अशावेळी वैद्यकीय पर्यटनसारख्या दिल्या जाणाऱ्या भेटी योग्य ठरत नाहीत. मुख्यालयी बसून परिस्थितीची माहिती घेणे व आवश्यक त्या साधनसुविधा संबंधितांना उपलब्ध करून देणे हेच अशावेळी योग्य ठरते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी यासंदर्भात वैद्यकीय आस्थापनांना खास पत्र पाठवून बेड्स उपलब्ध करून देऊन सहकार्य करण्याचे केलेले आवाहन महत्त्वाचे ठरावे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCorona vaccineकोरोनाची लस