शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:23 AM

गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल अशी भावना व्यक्त करणाऱ्या चव्हाण यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठीे पक्षाचा मेळावाही आयोजिला आहे.खासदारकीची हॅट््ट्रिक करणाऱ्या चव्हाण यांना सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही अशी भाजपात चर्चा होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. आताही त्या राष्टÑवादीच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु शिवसेनेतून राष्टÑवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भारती पवार यांची आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपात दाखल झाल्या. परिणामी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारीसाठी वेटिंगवर आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी चव्हाण यांच्या नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक घेण्यात आली. यात चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना प्रवेश देण्यात आल्याने संघटनेवरच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पक्षाशी संबंधित नसलेल्यांना अशाप्रकारे पक्षात स्थान देणे गैर आहे, असे सांगतानाच यावेळी मतदारसंघातील समर्थकांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.दरम्यान, भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच, मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल, असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून आपल्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, परंतु पक्ष विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेली पंधरा वर्षे संसदेतील माझे कामकाज पक्षाचे वरिष्ठ नेते बघत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या कामगिरीची तुलना करून निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.मग तो सर्व्हे कोणता?हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी अडचणीत आणण्याला एक सर्व्हे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मग, राष्टवादीला ज्या उमेदवाराच्या विजयाची खात्री नव्हती, तो उमेदवार भाजपाच्या सर्व्हेत यशस्वी कसा ठरला, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस