शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

स्मार्टफोनच नाहीत तर शिकणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:13 IST

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा न देता पुढील वर्गात आले आहेत. त्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले नाहीत. शाळा बंद असल्याने आॅनलाइन शिक्षणाचे प्रयोेग सुरू झाले आहेत. परंतु, या मुळे अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा न देता पुढील वर्गात आले आहेत. त्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले नाहीत. शाळा बंद असल्याने आॅनलाइन शिक्षणाचे प्रयोेग सुरू झाले आहेत. परंतु, या मुळे अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिक जिल्ह्यात विविध शिक्षण मंडळांशी संलग्न वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या एकूण १ हजार २७१ शाळा आहेत. त्यापैकी ४६७ शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहेत, तर २० शाळांना विविध तांत्रिक कारणांमुळे आॅनलाइन शिक्षण सुरू करता आलेले नाही, तर उर्वरित ७८४ शाळांमधील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ जुलैपर्यंत प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील वर्ग भरणार नाहीत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने विद्यार्थांचे लर्निंग फ्रॉम होम शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने सूचना केल्या आहेत. मात्र आॅनालाइन शिक्षण देणे शक्य होत नसल्याचे वास्तव आहे. ज्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ते नेहमी घरीच असतात असे नाही, नोकरी व्यवसायानिमित्त पालक घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांना स्मार्टफोनची उपलब्ध होतोच असे नाही. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी नेमकी कोणती वेळ निवडावी हा प्रश्न निर्माण झाला आहे.प्राथमिक विद्यार्थ्यांचा प्रश्न अधिक गंभीरमाध्यमिकच्या विद्यार्थ्यांना किमान स्मार्टफोन हाताळता येतो. त्यामुळे त्यांना आॅनलाइन वर्गात सहभागी होता येते. मात्र प्राथमिक विद्यार्थ्यांना स्मार्टफोन हाताळतानाही अडचण येत असल्याने पालकानाही वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांसोबत थांबावे लागते. त्यामुळे एकीकडे पालकांचे नियोजन कोलमडते, तर दुसरीकडे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांकडे स्मार्टफोनच उपलब्ध नसल्याने प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.सरकार याचा विचार करणार काकामावर जाताना अनेक पालक त्यांचे स्मार्टफोन सोबत घेऊन जातात. ते परतल्यानंतरच पाल्यांना स्मार्टफोन उपलब्ध होतो. त्यानंतर अभ्यास करणे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने टॅब अथवा स्मार्टफोन उपलब्ध देणे आवश्यक आहे.--------------------------कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग भरविणे शक्य नाही. आॅनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. आॅनलाइनमुळे ६० टक्के विद्यार्थी पुुढे जातील, तर उर्वरित विद्यार्थी मागे राहतील, त्यांना समान कक्षेत आणण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागले.- एस. बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक संघ--------------------प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण हे अधिक प्रभावी असते. आॅनलाइन शिक्षण केवळ विद्यार्थ्यांना शाळा बंद असताना व्यस्त ठेवण्याची सोय आहे. शिवाय शिवाय शिक्षण घेण्यात स्मार्टफोन, नेटवर्क, डेटा उपलब्धता आदी तांत्रिक अडचणी आहेत.- विलास पवार, पालक, नाशिक रोड

टॅग्स :Nashikनाशिक