शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

आयसीएसईचे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीला मूकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:30 IST

अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी शासनाने केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणच कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. त्यामुळे अकरावी प्रवेशसाठी शासनाने आयसीएसई, सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच मूल्यांकनाविषयी नवीन अटी-शर्ती लागू केल्याने अकरावी प्रवेशात यावर्षी नवीन गोंधळ निर्माण होऊन आयसीएससी बोर्डाचे अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशच्या प्रथम फेरीला मुकले आहे. 

ठळक मुद्देप्रथम प्रवेश फेरीपासून आयसीएसईचे विद्यार्थी वंचितशासनाच्या बदलणाऱ्या निर्णायामुळे ससेहोलपटऑनलाईन अर्जात तीनदा फेरबदल करूनही संधी चूकली

नाशिक : शासनाने अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणच कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. त्यामुळे अकरावी प्रवेशसाठी शासनाने आयसीएसई, सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच मूल्यांकनाविषयी नवीन अटी-शर्ती लागू केल्याने अकरावी प्रवेशात यावर्षी नवीन गोंधळ निर्माण होऊन आयसीएससी बोर्डाचे अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशच्या प्रथम फेरीला मुकले आहे. आयसीएसई व सीबीएसईच्या तुलनेच महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाकडून शिक्षण घेणारे आणि परीक्षा देणारे विद्यार्थी मागे पडतात, ही नेहमीची ओरड आहे. हा गोंधळ थांबविण्यासाठी कधी अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांची खैरात देण्याचा, तर कधी हे मूल्यांकन थांबविण्याचा निर्णय तुघलकी पद्धतीने घेतला जातो. या दोहोंमुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेतला गोंधळ कमी होत नसून वाढतानाच दिसून येत आहे. दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण व गुणांची टक्केवारी मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अकरावीच्या गुणाधिष्ठित प्रवेशप्रक्रियेमध्ये केंद्रीय परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारण्याचे संकेत दिसताच शासनाने आयसीएसई व सीबीएसईच्या मूल्यांकनासाठीही अंतर्गत गुण वगळण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाला विरोध झाल्याने सर्वोत्तम पाच विषयांचा पर्याय समोर आला. मात्र त्यातही आयसीएसईचा संगणक विषय वगळण्याचा निर्णय झाल्याने पहिल्या पाचच विषयांचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय झाला. मात्र या गोंधळात विद्यार्थी आणि पालकही संभ्रमात पडल्याने त्यांना वेळोवेळी  अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश अर्जात बदल करावा लागला. मात्र या संभ्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शेवटच्या टप्प्यात उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आॅनलाइन अर्जात बदलच केला नसल्याने अशा विद्यार्थ्यांची प्रथम प्रवेश फेरीत निवडच झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रथम फेरीत प्रवेशाची संधी चुकलेल्या पालकांनी दुसºया फेरीतील प्रक्रियेत शासनाकडून सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

दुसऱ्या फेरीची करावी लागणार प्रतीक्षा पहिल्या फेरीत वारंवार आॅनलाइन अर्जात फेरबदल करूनही आयसीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशप्र्रक्रियेच्या प्रथम फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे अशा पालकांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा असून, त्यांना १७ व १८ जुलै या दोन दिवसांत आॅनलाइन अर्जात बदल करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित झाल्यानंतरच या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळणार की नाही ते स्पष्ट होऊ शकणार आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय