शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

कसे म्हणावे, भुजबळांचा करिश्मा संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:08 IST

सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही.

नाशिक : सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही. फार दूरची गोष्ट नाही, झालीत उणीपुरी चार वर्षे व त्यातीलही तुरुंगात काढलेले २६ महिने सोडले, तर एकेकाळी राज्याचे हेविवेट मंत्री म्हणून राहिलेल्या भुजबळ यांचा करिश्मा आता जवळपास संपला असेच वाटू लागले आहे. अगदी त्यांच्या कर्मभूमीत स्वपक्षीय उमेदवाराचा विधान परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर तर पुन्हा तसा करिश्मा परत येईल की नाही याविषयी शंका वाटू लागली आहे; परंतु भुजबळ यांच्याशी त्याकाळी प्रत्येक गोष्टीशी जोडण्यात येत असलेल्या संबंधातील घटना, घडामोडी मात्र अजूनही कायम आहेत.राष्टÑवादीच्या स्थापनेलाच पक्षाचे राज्याचे प्रमुखपद घेऊन मैदानात उतरलेल्या छगन भुजबळ यांनी दुसºयाच वर्षी येवला मतदारसंघाचे मैदान निवडणुकीसाठी निवडले व मतदारांनीही भुजबळ यांना दणदणीत मताधिक्याने निवडून पाठविले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्टवादीची यशाची कमान कायम उंचावत राहिली. नाशिककरांनी केलेल्या सहकार्यावर भुजातील ‘बळ’ वाढतच गेले, परिणामी अगदी विधान परिषदेच्या मतदारसंघात पक्षाचा एकमेव सदस्य असताना देवीदास पिंगळे यांनी निवडणुकीत बाजी मारण्याचा विक्रमही भुजबळांच्या काळातच राष्टÑवादीने केला. त्यामुळे राज्यात व केंद्रातही सत्तेत दहा वर्षे सहभागी राहिलेल्या राष्टÑवादीचा नाशिक जिल्ह्यात दबदबा कायम राखण्यात भुजबळ यांना यश आले. या यशातून साहजिकच पक्षाची सारी सूत्रे त्यांच्या हाती आली.एवढेच नव्हे तर भुजबळ यांची राजकीय कारकीर्द व सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता अन्य पक्षांतील घटना, घडामोडी भुजबळ यांच्या भोवती फिरू लागल्या. सत्तेचे लाभलेले पाठबळ, अफाट जनसंपर्क व अशक्याचे शक्य करून दाखविण्याचे असलेले कसब यामुळे भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व विरोधकांप्रमाणेच स्वकीयांनाही डाचू लागले; परिणामी प्रत्येक गोष्टीशी भुजबळ यांचा संंबंध जोडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. कधी भुजबळांचा गुन्हेगारांशी तर कधी गुंडांशी संबंध, काळे धंदे, अवैध व्यावसायिकांना कायमच त्यांच्याकडून अभय दिले जात असल्याचे किटाळ लावण्यात आले. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणे असो वा खंडणीखोरांनी मांडलेल्या उच्छादाला भुजबळ व त्यांचे समर्थकच कसे जबाबदार याचे गल्लोगल्ली पोवाडेच सादर केले गेले. संपूर्ण नाशिककर भुजबळांच्या जाचाने भयभीत होऊन परजिल्ह्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र रंगविण्यात आले.बेरोजगारी, भूकबळी, औद्योगिक तंट्यांना भुजबळच कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले व हा सर्व अनीती, अन्याय, अत्याचार भुजबळ यांच्या इशाºयावरच चालत असल्याने त्यातून मुक्तीसाठी भुजबळ यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून वचपा काढण्यात आला. तुरुंगात बंदिस्त झाल्यानंतर भुजबळ संपल्याची आवई विरोधकांनी उठविली. भुजबळ यांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्या काळात नाशिककरांवर होणारा उपरोक्त अन्याय कायम राहिला; पण त्याची जबाबदारी मात्र कोणावर निश्चित करण्याची तसदी घेतली गेली नाही. आता तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ तुरुंगातून बाहेर पडले व थेट रुग्णशय्येवर गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीची सारी जबाबदारी आपसूकच अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर येऊन पडली. पण करिश्मा संपलेल्या भुजबळ यांचा आशीर्वाद सहाणे यांना कामी न आल्याने पराभव पदरात पडला. विजयी झालेले नरेंद्र दराडे ‘भुजबळ यांच्या सहकार्याने विजय मिळाला’ अशी प्रतिक्रिया देत असतील तर भुजबळांचा करिश्मा संपला, असे कसे म्हणता यावे?

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ