शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कसे म्हणावे, भुजबळांचा करिश्मा संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:08 IST

सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही.

नाशिक : सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही. फार दूरची गोष्ट नाही, झालीत उणीपुरी चार वर्षे व त्यातीलही तुरुंगात काढलेले २६ महिने सोडले, तर एकेकाळी राज्याचे हेविवेट मंत्री म्हणून राहिलेल्या भुजबळ यांचा करिश्मा आता जवळपास संपला असेच वाटू लागले आहे. अगदी त्यांच्या कर्मभूमीत स्वपक्षीय उमेदवाराचा विधान परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर तर पुन्हा तसा करिश्मा परत येईल की नाही याविषयी शंका वाटू लागली आहे; परंतु भुजबळ यांच्याशी त्याकाळी प्रत्येक गोष्टीशी जोडण्यात येत असलेल्या संबंधातील घटना, घडामोडी मात्र अजूनही कायम आहेत.राष्टÑवादीच्या स्थापनेलाच पक्षाचे राज्याचे प्रमुखपद घेऊन मैदानात उतरलेल्या छगन भुजबळ यांनी दुसºयाच वर्षी येवला मतदारसंघाचे मैदान निवडणुकीसाठी निवडले व मतदारांनीही भुजबळ यांना दणदणीत मताधिक्याने निवडून पाठविले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्टवादीची यशाची कमान कायम उंचावत राहिली. नाशिककरांनी केलेल्या सहकार्यावर भुजातील ‘बळ’ वाढतच गेले, परिणामी अगदी विधान परिषदेच्या मतदारसंघात पक्षाचा एकमेव सदस्य असताना देवीदास पिंगळे यांनी निवडणुकीत बाजी मारण्याचा विक्रमही भुजबळांच्या काळातच राष्टÑवादीने केला. त्यामुळे राज्यात व केंद्रातही सत्तेत दहा वर्षे सहभागी राहिलेल्या राष्टÑवादीचा नाशिक जिल्ह्यात दबदबा कायम राखण्यात भुजबळ यांना यश आले. या यशातून साहजिकच पक्षाची सारी सूत्रे त्यांच्या हाती आली.एवढेच नव्हे तर भुजबळ यांची राजकीय कारकीर्द व सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता अन्य पक्षांतील घटना, घडामोडी भुजबळ यांच्या भोवती फिरू लागल्या. सत्तेचे लाभलेले पाठबळ, अफाट जनसंपर्क व अशक्याचे शक्य करून दाखविण्याचे असलेले कसब यामुळे भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व विरोधकांप्रमाणेच स्वकीयांनाही डाचू लागले; परिणामी प्रत्येक गोष्टीशी भुजबळ यांचा संंबंध जोडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. कधी भुजबळांचा गुन्हेगारांशी तर कधी गुंडांशी संबंध, काळे धंदे, अवैध व्यावसायिकांना कायमच त्यांच्याकडून अभय दिले जात असल्याचे किटाळ लावण्यात आले. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणे असो वा खंडणीखोरांनी मांडलेल्या उच्छादाला भुजबळ व त्यांचे समर्थकच कसे जबाबदार याचे गल्लोगल्ली पोवाडेच सादर केले गेले. संपूर्ण नाशिककर भुजबळांच्या जाचाने भयभीत होऊन परजिल्ह्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र रंगविण्यात आले.बेरोजगारी, भूकबळी, औद्योगिक तंट्यांना भुजबळच कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले व हा सर्व अनीती, अन्याय, अत्याचार भुजबळ यांच्या इशाºयावरच चालत असल्याने त्यातून मुक्तीसाठी भुजबळ यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून वचपा काढण्यात आला. तुरुंगात बंदिस्त झाल्यानंतर भुजबळ संपल्याची आवई विरोधकांनी उठविली. भुजबळ यांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्या काळात नाशिककरांवर होणारा उपरोक्त अन्याय कायम राहिला; पण त्याची जबाबदारी मात्र कोणावर निश्चित करण्याची तसदी घेतली गेली नाही. आता तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ तुरुंगातून बाहेर पडले व थेट रुग्णशय्येवर गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीची सारी जबाबदारी आपसूकच अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर येऊन पडली. पण करिश्मा संपलेल्या भुजबळ यांचा आशीर्वाद सहाणे यांना कामी न आल्याने पराभव पदरात पडला. विजयी झालेले नरेंद्र दराडे ‘भुजबळ यांच्या सहकार्याने विजय मिळाला’ अशी प्रतिक्रिया देत असतील तर भुजबळांचा करिश्मा संपला, असे कसे म्हणता यावे?

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ