शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कसे म्हणावे, भुजबळांचा करिश्मा संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:08 IST

सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही.

नाशिक : सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही. फार दूरची गोष्ट नाही, झालीत उणीपुरी चार वर्षे व त्यातीलही तुरुंगात काढलेले २६ महिने सोडले, तर एकेकाळी राज्याचे हेविवेट मंत्री म्हणून राहिलेल्या भुजबळ यांचा करिश्मा आता जवळपास संपला असेच वाटू लागले आहे. अगदी त्यांच्या कर्मभूमीत स्वपक्षीय उमेदवाराचा विधान परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर तर पुन्हा तसा करिश्मा परत येईल की नाही याविषयी शंका वाटू लागली आहे; परंतु भुजबळ यांच्याशी त्याकाळी प्रत्येक गोष्टीशी जोडण्यात येत असलेल्या संबंधातील घटना, घडामोडी मात्र अजूनही कायम आहेत.राष्टÑवादीच्या स्थापनेलाच पक्षाचे राज्याचे प्रमुखपद घेऊन मैदानात उतरलेल्या छगन भुजबळ यांनी दुसºयाच वर्षी येवला मतदारसंघाचे मैदान निवडणुकीसाठी निवडले व मतदारांनीही भुजबळ यांना दणदणीत मताधिक्याने निवडून पाठविले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्टवादीची यशाची कमान कायम उंचावत राहिली. नाशिककरांनी केलेल्या सहकार्यावर भुजातील ‘बळ’ वाढतच गेले, परिणामी अगदी विधान परिषदेच्या मतदारसंघात पक्षाचा एकमेव सदस्य असताना देवीदास पिंगळे यांनी निवडणुकीत बाजी मारण्याचा विक्रमही भुजबळांच्या काळातच राष्टÑवादीने केला. त्यामुळे राज्यात व केंद्रातही सत्तेत दहा वर्षे सहभागी राहिलेल्या राष्टÑवादीचा नाशिक जिल्ह्यात दबदबा कायम राखण्यात भुजबळ यांना यश आले. या यशातून साहजिकच पक्षाची सारी सूत्रे त्यांच्या हाती आली.एवढेच नव्हे तर भुजबळ यांची राजकीय कारकीर्द व सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता अन्य पक्षांतील घटना, घडामोडी भुजबळ यांच्या भोवती फिरू लागल्या. सत्तेचे लाभलेले पाठबळ, अफाट जनसंपर्क व अशक्याचे शक्य करून दाखविण्याचे असलेले कसब यामुळे भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व विरोधकांप्रमाणेच स्वकीयांनाही डाचू लागले; परिणामी प्रत्येक गोष्टीशी भुजबळ यांचा संंबंध जोडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. कधी भुजबळांचा गुन्हेगारांशी तर कधी गुंडांशी संबंध, काळे धंदे, अवैध व्यावसायिकांना कायमच त्यांच्याकडून अभय दिले जात असल्याचे किटाळ लावण्यात आले. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणे असो वा खंडणीखोरांनी मांडलेल्या उच्छादाला भुजबळ व त्यांचे समर्थकच कसे जबाबदार याचे गल्लोगल्ली पोवाडेच सादर केले गेले. संपूर्ण नाशिककर भुजबळांच्या जाचाने भयभीत होऊन परजिल्ह्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र रंगविण्यात आले.बेरोजगारी, भूकबळी, औद्योगिक तंट्यांना भुजबळच कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले व हा सर्व अनीती, अन्याय, अत्याचार भुजबळ यांच्या इशाºयावरच चालत असल्याने त्यातून मुक्तीसाठी भुजबळ यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून वचपा काढण्यात आला. तुरुंगात बंदिस्त झाल्यानंतर भुजबळ संपल्याची आवई विरोधकांनी उठविली. भुजबळ यांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्या काळात नाशिककरांवर होणारा उपरोक्त अन्याय कायम राहिला; पण त्याची जबाबदारी मात्र कोणावर निश्चित करण्याची तसदी घेतली गेली नाही. आता तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ तुरुंगातून बाहेर पडले व थेट रुग्णशय्येवर गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीची सारी जबाबदारी आपसूकच अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर येऊन पडली. पण करिश्मा संपलेल्या भुजबळ यांचा आशीर्वाद सहाणे यांना कामी न आल्याने पराभव पदरात पडला. विजयी झालेले नरेंद्र दराडे ‘भुजबळ यांच्या सहकार्याने विजय मिळाला’ अशी प्रतिक्रिया देत असतील तर भुजबळांचा करिश्मा संपला, असे कसे म्हणता यावे?

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ