शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

कसे म्हणावे, भुजबळांचा करिश्मा संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:08 IST

सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही.

नाशिक : सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही. फार दूरची गोष्ट नाही, झालीत उणीपुरी चार वर्षे व त्यातीलही तुरुंगात काढलेले २६ महिने सोडले, तर एकेकाळी राज्याचे हेविवेट मंत्री म्हणून राहिलेल्या भुजबळ यांचा करिश्मा आता जवळपास संपला असेच वाटू लागले आहे. अगदी त्यांच्या कर्मभूमीत स्वपक्षीय उमेदवाराचा विधान परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर तर पुन्हा तसा करिश्मा परत येईल की नाही याविषयी शंका वाटू लागली आहे; परंतु भुजबळ यांच्याशी त्याकाळी प्रत्येक गोष्टीशी जोडण्यात येत असलेल्या संबंधातील घटना, घडामोडी मात्र अजूनही कायम आहेत.राष्टÑवादीच्या स्थापनेलाच पक्षाचे राज्याचे प्रमुखपद घेऊन मैदानात उतरलेल्या छगन भुजबळ यांनी दुसºयाच वर्षी येवला मतदारसंघाचे मैदान निवडणुकीसाठी निवडले व मतदारांनीही भुजबळ यांना दणदणीत मताधिक्याने निवडून पाठविले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्टवादीची यशाची कमान कायम उंचावत राहिली. नाशिककरांनी केलेल्या सहकार्यावर भुजातील ‘बळ’ वाढतच गेले, परिणामी अगदी विधान परिषदेच्या मतदारसंघात पक्षाचा एकमेव सदस्य असताना देवीदास पिंगळे यांनी निवडणुकीत बाजी मारण्याचा विक्रमही भुजबळांच्या काळातच राष्टÑवादीने केला. त्यामुळे राज्यात व केंद्रातही सत्तेत दहा वर्षे सहभागी राहिलेल्या राष्टÑवादीचा नाशिक जिल्ह्यात दबदबा कायम राखण्यात भुजबळ यांना यश आले. या यशातून साहजिकच पक्षाची सारी सूत्रे त्यांच्या हाती आली.एवढेच नव्हे तर भुजबळ यांची राजकीय कारकीर्द व सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता अन्य पक्षांतील घटना, घडामोडी भुजबळ यांच्या भोवती फिरू लागल्या. सत्तेचे लाभलेले पाठबळ, अफाट जनसंपर्क व अशक्याचे शक्य करून दाखविण्याचे असलेले कसब यामुळे भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व विरोधकांप्रमाणेच स्वकीयांनाही डाचू लागले; परिणामी प्रत्येक गोष्टीशी भुजबळ यांचा संंबंध जोडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. कधी भुजबळांचा गुन्हेगारांशी तर कधी गुंडांशी संबंध, काळे धंदे, अवैध व्यावसायिकांना कायमच त्यांच्याकडून अभय दिले जात असल्याचे किटाळ लावण्यात आले. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणे असो वा खंडणीखोरांनी मांडलेल्या उच्छादाला भुजबळ व त्यांचे समर्थकच कसे जबाबदार याचे गल्लोगल्ली पोवाडेच सादर केले गेले. संपूर्ण नाशिककर भुजबळांच्या जाचाने भयभीत होऊन परजिल्ह्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र रंगविण्यात आले.बेरोजगारी, भूकबळी, औद्योगिक तंट्यांना भुजबळच कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले व हा सर्व अनीती, अन्याय, अत्याचार भुजबळ यांच्या इशाºयावरच चालत असल्याने त्यातून मुक्तीसाठी भुजबळ यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून वचपा काढण्यात आला. तुरुंगात बंदिस्त झाल्यानंतर भुजबळ संपल्याची आवई विरोधकांनी उठविली. भुजबळ यांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्या काळात नाशिककरांवर होणारा उपरोक्त अन्याय कायम राहिला; पण त्याची जबाबदारी मात्र कोणावर निश्चित करण्याची तसदी घेतली गेली नाही. आता तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ तुरुंगातून बाहेर पडले व थेट रुग्णशय्येवर गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीची सारी जबाबदारी आपसूकच अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर येऊन पडली. पण करिश्मा संपलेल्या भुजबळ यांचा आशीर्वाद सहाणे यांना कामी न आल्याने पराभव पदरात पडला. विजयी झालेले नरेंद्र दराडे ‘भुजबळ यांच्या सहकार्याने विजय मिळाला’ अशी प्रतिक्रिया देत असतील तर भुजबळांचा करिश्मा संपला, असे कसे म्हणता यावे?

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ