शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

नाशिक : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक हुशार विद्यार्थ्यांना तुलनेत कमी, ...

नाशिक : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक हुशार विद्यार्थ्यांना तुलनेत कमी, तर त्यांच्याच बरोबरीच्या अथवा त्यांच्यापेक्षा काही प्रमाणात कमी हुशार विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले. अशाप्रकारे अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी आता शिक्षक, अधिकारी यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याचे चित्र दिसून येत असून, कोरोना संकटात विद्यार्थ्यांचा संसर्गापासून बचाव झाल्याच्या रूपाने अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे दिसून येत असले तरी विद्यार्थ्यांच्या मनात निकालाविषयी निर्माण झालेल्या साशंकतेच्या रूपाने या मूल्यांकन पद्धतीचे काही तोटेही आता समार येऊ लागले आहेत. मात्र, या निकालात बहूतांश विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असल्याने अशा प्रकारच्या तक्रारी अल्प प्रमाणात असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे.

---

एकूण विद्यार्थी

दहावी -९२,२२६

बारावी -६८,५१६

पास झालेले विद्यार्थी

दहावी - ९२,२१०

बारावी - ६८,२२३

--

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

- कोरोनामुळे दहावी, बारावीची परीक्षाच झाली नाही

अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान करून निकाल जाहीर करण्यात आला.

- परीक्षाच झाली नाही. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी मिळाली नाही.

परीक्षा न झाल्याने कमी गुण मिळाल्याची दाद कशी आणि कुठे मागणार हा प्रश्न विद्यार्थ्यी व पालकांसमोर निर्माण झाला आहे.

- साधारण गुणवत्तेचा विद्यार्थी मात्र त्याला चांगले गुण मिळाल्याने खूश आहे. परंतु, चांगले गुण मिळवूनही अकरावी प्रवेशासाठी कसरत करावी लागणार असल्याने हुशार विद्यार्थी मात्र चिंतित आहेत.

----

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेले गुण अपेक्षित आहेत. परंतु, परीक्षा झाली असती तर आणखी काही

गुण वाढले असते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा काहींना फायदा व काहींना तोटादेखील झाला आहे. मला दोन विषयात कमी गुण मिळाले आहेत. परीक्षा झाली असती तर नक्कीच जास्त गुण मिळविले असते.

-एक विद्यार्थिनी.

अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बोर्डाने ठरवून दिली होती. वास्तविक नववीचा विद्यार्थी दहावीत चांगला

अभ्यास करतो. त्यामुळे तो दहावीच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो. परंतु, परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली नसल्याची मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा आहे.

-एक विद्यार्थी

----

कोरोना काळात संसर्गाचे संकट असल्यामुळे शाळा बंद होत्या, परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत चांगली झाली. परंतु, लेखी परीक्षेपेक्षा अंतर्गत मूल्यमापनात पाल्याला कमी गुण मिळाल्याचे एका पालकाने सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाने वारंवार सूचना देऊन आणि पडताळणी करून शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन करून घेतले. त्यामुळे त्यात पारदर्शकता असल्याचे मत काही पालकांकडून व्यक्त होत आहे. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने अकरावीसाठी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे कठीण झाल्याचेही काही पालकांनी नमूद केले.