शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

नाशिक : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक हुशार विद्यार्थ्यांना तुलनेत कमी, ...

नाशिक : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक हुशार विद्यार्थ्यांना तुलनेत कमी, तर त्यांच्याच बरोबरीच्या अथवा त्यांच्यापेक्षा काही प्रमाणात कमी हुशार विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले. अशाप्रकारे अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी आता शिक्षक, अधिकारी यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याचे चित्र दिसून येत असून, कोरोना संकटात विद्यार्थ्यांचा संसर्गापासून बचाव झाल्याच्या रूपाने अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे दिसून येत असले तरी विद्यार्थ्यांच्या मनात निकालाविषयी निर्माण झालेल्या साशंकतेच्या रूपाने या मूल्यांकन पद्धतीचे काही तोटेही आता समार येऊ लागले आहेत. मात्र, या निकालात बहूतांश विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असल्याने अशा प्रकारच्या तक्रारी अल्प प्रमाणात असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे.

---

एकूण विद्यार्थी

दहावी -९२,२२६

बारावी -६८,५१६

पास झालेले विद्यार्थी

दहावी - ९२,२१०

बारावी - ६८,२२३

--

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

- कोरोनामुळे दहावी, बारावीची परीक्षाच झाली नाही

अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान करून निकाल जाहीर करण्यात आला.

- परीक्षाच झाली नाही. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी मिळाली नाही.

परीक्षा न झाल्याने कमी गुण मिळाल्याची दाद कशी आणि कुठे मागणार हा प्रश्न विद्यार्थ्यी व पालकांसमोर निर्माण झाला आहे.

- साधारण गुणवत्तेचा विद्यार्थी मात्र त्याला चांगले गुण मिळाल्याने खूश आहे. परंतु, चांगले गुण मिळवूनही अकरावी प्रवेशासाठी कसरत करावी लागणार असल्याने हुशार विद्यार्थी मात्र चिंतित आहेत.

----

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेले गुण अपेक्षित आहेत. परंतु, परीक्षा झाली असती तर आणखी काही

गुण वाढले असते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा काहींना फायदा व काहींना तोटादेखील झाला आहे. मला दोन विषयात कमी गुण मिळाले आहेत. परीक्षा झाली असती तर नक्कीच जास्त गुण मिळविले असते.

-एक विद्यार्थिनी.

अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बोर्डाने ठरवून दिली होती. वास्तविक नववीचा विद्यार्थी दहावीत चांगला

अभ्यास करतो. त्यामुळे तो दहावीच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो. परंतु, परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली नसल्याची मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा आहे.

-एक विद्यार्थी

----

कोरोना काळात संसर्गाचे संकट असल्यामुळे शाळा बंद होत्या, परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत चांगली झाली. परंतु, लेखी परीक्षेपेक्षा अंतर्गत मूल्यमापनात पाल्याला कमी गुण मिळाल्याचे एका पालकाने सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाने वारंवार सूचना देऊन आणि पडताळणी करून शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन करून घेतले. त्यामुळे त्यात पारदर्शकता असल्याचे मत काही पालकांकडून व्यक्त होत आहे. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने अकरावीसाठी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे कठीण झाल्याचेही काही पालकांनी नमूद केले.