शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

होळीचा सण : आदिवासी भागातील वनक्षेत्रात ‘अ‍ॅलर्ट’

By अझहर शेख | Updated: March 20, 2019 13:58 IST

या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देहोळीचा सण जागतिक वनदिनाच्या पुर्वसंध्येला साजरा

अझहर शेख, नाशिक :होळी’निमित्तनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, इगतपुरी आदि आदिवासीबहुल वनपरिक्षेत्रांमध्ये नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाकडून ‘अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने या भागातील जंगलांमध्ये चोख गस्त घालण्याचे आदेश वनरक्षकांना देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने वनक्षेत्र आदिवासी जिल्ह्यांमध्ये टिकून आहे. या भागातील जंगलसंवर्धन आदिवासी जनतेच्या मदतीने वनविभागाकडून केले जात आहे. ‘होळी’चा सण आदिवासी संस्कृतीती मोठा सण मानला जातो. या सणाला आदिवासी बांधवांकडून मोठा उत्सव साजरा होतो. या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. होळीचे निमित्त करून वनक्षेत्रात घुसखोरी करत वृक्षतोड करताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच होळीचा सण जागतिक वनदिनाच्या पुर्वसंध्येला साजरा होत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर वनांचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यावर वनविभागाकडून भर दिला जात आहे.संपुर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास ३ हजार ४३० चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर वने टिकून आहेत. त्यापैकी वनविभागाच्या एकूण वनक्षेत्र ३ हजार १९२ चौरस किलोमीटर इतके आहे. यामध्ये संरक्षित वन क्षेत्र, राखीव वने, संरक्षित क्षेत्राचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याची पुर्व-पश्चिम अशी विभागणी वनविभागाने तालुकानिहाय केली आहे.वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांनी वैयक्तिक सहभाग घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

वने टिकली तर पृथ्वी टिकेल...

वनांचे अस्तित्व सजीवसृष्टीसाठी महत्त्वाचे आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या जोपासणेसाठी वने टिकविणे ती वाढविणे काळाची गरज आहे. कारण वने टिकली तर पर्जन्यमानाचे प्रमाण संतुलन टिकून राहील आणि वनोपजाच्या माध्यमातून उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लागेल तसेच वन्यप्राण्यांची जैवविविधता जोपासण्यास मदत होईल. चांगल्या पर्जन्यमानासाठी तसेच नदी, नाले, आहोळ वाहते ठेवण्यासाठी आपआपल्या भागातील वनांचे रक्षण करणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. वनाच्छादित प्रदेश कसा वाढविता येईल, या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड व संवर्धनावर भर देण्याची गरज आहे.---नाशिक जिल्ह्याची जैवविविधता समृध् व सक्षम करण्यासाठी वन संरक्षण करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीकडे होणारा प्रवास वने संरक्षित नसल्याचे संकेत देणारा आहे. त्यामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष वाढण्यास मदत होत आहे. वने टिकली तर त्या वनांमध्ये वन्यप्राण्यांची गुजराणसाठी लागणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची निर्मिती होईल, आणि त्यांचा नागरी वस्तीकडे होणारा प्रवास कुठेतरी थांबेल. नागरिकांनी कुºहाडबंदी, शिकारबंदी, चराईबंदीसह अतिक्रमणाचे नियम काटेकोरपणे पाळावेत. जंगलात स्वार्थापोटी आगी लावू नयेत. तसेच वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, एवढेच आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो. जंगलाला आगी लावण्याचे प्रकार टाळावे, अतिक्रमणांपासून दूर रहावे, वेळ लागणार.- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम भागशासनाच्या ३३कोटी वृक्ष लागवड संवर्धन अभियानात जनतेने वैयक्तिक सहभाग वाढवावा. जेणेकरून वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल. आपआपल्या परिसरात मोकळ्या जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करावे. सभोवताली अस्तित्वात असलेल्या वनांचे संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. वनांचा सांभाळ ही केवळ शासनाची किंवा वनविभागाची जबाबदारी नसून जनतेचीदेखील जबाबदारी आहे. वनांचा फायदा सर्वांगिण सजीवसृष्टीला होत असतो, हे लक्षात घ्यावे.- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक नाशिक पुर्व भाग 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागHoliहोळी