शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 3:32 PM

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देखड्डे, पाण्याच्या डबक्यांमधुन काढावा लागतोय मार्गआपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक : शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.पावसामुळे दरवर्षीच शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था होत असते. त्यामुळे दिवसांगणिक खड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निर्दर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहरांची दुरुस्ती ही दरवर्षी करण्यात येते मात्र पुन्हा या मार्गांची दुरवस्था होऊन मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार होत असतात त्यामुळे प्रशासनाक डून नेमक्या कशाप्रकारे दुरुस्ती करण्यात येते याबाबत नागरिकांनाकडुन प्रश्न उपस्थित होत आहे. असा कुठलाच मार्ग नाही ज्याठिकाणी खड्डे बघायला मिळत नाही. त्यात नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गाची अवस्था बिकट होत चालली आहे. याठिकाणी खड्यांचे प्रमाण दरवेळीपेक्षा अजुन वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी खड्यांसह पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही पाण्यातुनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.संपुर्ण महामार्गावरच खड्डेनाशिकरोड ते द्वारकापर्यंत संपुर्ण महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. सावरकर उड्डानपुलाच्या सुरुवातीपासुनच खड्डे बघायला मिळतात. तसेच पुढे बिटको महाविद्यालय, बिग बाजार, मुद्रणालय कॉलनी, अशोका सिग्नल, भाभा नगर सिग्नल या भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. त्यात या खड्यांमध्ये पावसाचे पाण्याचे डबके साचल्यामुळे प्रवाशांना व पादचाºयांनांही यातूनच मार्ग काढावा लागत आहे. अशात याठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे.

दररोज शहरात येतांना मार्गावर एक नवीन खड्डा तयार झालेला दिसतो, मात्र कमी होतांना दिसत नाही. त्यात नव्याने तयार झालेल्या खड्यांना चुकविण्यात काही जणांचा अपघात देखील झाला. त्यामुळे प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? त्यात या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत असते. अशात या मार्गाची कायमस्वरुपी दुरुस्थी होणे गरजेचे आहे.तुषार गाडे, प्रवासी 

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा