शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कादवाचा सर्वाधिक साखर उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:23 IST

गेल्या वर्षीचा दुष्काळ अन् यंदा लांबलेला परतीचा पाऊस यामुळे राज्यभर उसाचे उत्पादन घटत साखर उताराही घटला असून, अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम मार्चअखेर आटोपणार आहे. मध्य विभागात नाशिक जिल्ह्यातील कादवाचा साखर उतारा सर्वाधिक ११.४३ टक्के असून, कादवात दोन लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.

ठळक मुद्देपावणेदोन लाख टन गाळप । जिल्ह्यासह मध्य महाराष्टÑात उच्चांक

दिंडोरी : गेल्या वर्षीचा दुष्काळ अन् यंदा लांबलेला परतीचा पाऊस यामुळे राज्यभर उसाचे उत्पादन घटत साखर उताराही घटला असून, अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम मार्चअखेर आटोपणार आहे. मध्य विभागात नाशिक जिल्ह्यातील कादवाचा साखर उतारा सर्वाधिक ११.४३ टक्के असून, कादवात दोन लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.गेल्या वर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले त्यातच गेल्यावर्षी चारा टंचाईमुळे मोठ्या प्रमाणात चाऱ्याला उसाचा वापर झाल्याने यंदा सर्वच कारखान्यांना ऊस टंचाईचा सामना करावा लागला. जी उसाची लागवड झालेली होती तिला उन्हाळ्यात पाणी कमी मिळाले तर पावसाळ्यात उशिरा पाऊस होऊन तो अति झाल्याने व लांबल्याने उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन घटले असल्याने सर्वच कारखान्यांना गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडचण आली आहे तसेच साखर उताराही घटला आहे. परिणामी यंदा उसाचे उत्पादन घटल्याने त्याचा फटका कारखान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसणार आहे. मध्य विभागात एकूण ९० साखर कारखाने सुरू आहे त्यात नाशिक, नगर, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना व खासगी द्वारकाधीश सुरू आहे. यंदा निफाड नाशिक तालुक्यात या दोन कारखान्यांसोबतच नगर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने उतरल्याने जानेवारीतच येथील ऊस आटोपला आहे. मध्य विभागात कादवाचा साखर उतारा सर्वाधिक ११.४३ टक्के असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर ११.४१ टक्के आहे.कादवाने ७९ दिवसांत १,७७,४२३ टन उसाचे गाळप करून सरासरी ११.४३ टक्के साखर उतारा मिळवत दोन लाख ८०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. मार्चअखेर जवळपास बहुतांशी कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपण्याची चिन्ह आहेत. जिल्ह्यात कादवाचे १.७७ लाख मे. टन, तर द्वारकाधीशचे ३.१५ लाख मे. टन असे एकूण ४.९२ लाख मे. टन गाळप झाले आहे.

गेल्या वर्षीचा दुष्काळ व यंदाचा अतिपाऊस यामुळे उसाचे उत्पादन राज्यभर घटले असल्याने सर्वच कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. सरकार उसाच्या एफआरपीचे व साखरेचे किमान दर ठरवते; मात्र साखरेचे दर कमी असल्याने कोणत्याच कारखान्याला एफआरपी देणे शक्य होत नाही त्यासाठी सरकार कर्जरूपी मदत करते त्याऐवजी सरकारने साखरेचे किमान दर एफआरपी दराच्या तुलनेत वाढवणे आवश्यक आहे तरच कारखाने सुस्थितीत चालू शकतील.- श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने