शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; चार धरणांमधून विसर्ग सुरू 

By sandeep.bhalerao | Updated: September 8, 2023 15:08 IST

नांदुरमध्यमेश्वर धरणामधील विसर्ग सकाळी वाढविण्यात आला आहे.

संदीप भालेराव, नाशिक: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.८) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर नाशिक शहरातील रस्ते जलमय झाले होते. गोदावरी नदीत बस अडकल्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील चार धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. 

नांदुरमध्यमेश्वर धरणामधील विसर्ग सकाळी वाढविण्यात आला आहे. दुपारपर्यंत या धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कडवा धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने कडवा धरणातूनही १६९६ इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी ८४८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. पालखेडच्या धरण सुमहात तसेच इतरही सर्वच क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने कोळवण नदीला आलेल्या पुरामुळे धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कादवा नदीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   आळंदी पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग केला जाणार असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातूनही १०४० क्युसेक विसिर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक