शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:48 IST

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकºयांना रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. लेट खरीप आणि सध्या लावणी सुरू असलेल्या रांगड्या कांद्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारा आहे.

नाशिक : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकºयांना रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. लेट खरीप आणि सध्या लावणी सुरू असलेल्या रांगड्या कांद्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारा आहे. रविवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे शेतात सोंगणी करून पडलेला आणि खळ्यावर असलेला मका काही प्रमाणात भिजला. काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला लाल कांदा, मका झाकण्यासाठी शेतकºयांची धावपळ उडाली. ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने व्यापारी वर्गाची मात्र चिंता वाढली आहे.लोहोणेरशहर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकºयांची चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहोणेर व परिसरातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या लोहोणेर व परिसरात कांदा लागवडीसाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. कांदा रोप लागवडीसाठी तयार होत असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतित आहे. या पावसामुळे कांदा पिकाच्या रोपांचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकरी मका काढणीत व्यस्त असल्याने त्यांचीही धावपळ उडाली. काहीकाळ विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता.चांदवडशहर व परिसरात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी विजेच्या कडकडाटांसह सुमारे एक तास पाऊस सुरू होता. चांदवड शहरातील वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चांदवड तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे पिकांचे नुकसान आहे. वादळ वारा, विजेच्या कडकडाटासह सुमारे एक तास पाऊस झाला.वडनेरभैरववडनेरभैरव परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे. कही द्राक्षबागा फुलोºयात आहे पावसामुळे कुज गळ होऊन शेतकºयांचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.खामखेडापरिसरात रविवारी सायंकाळी अचनक विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. सकाळपासून प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत होता. परंतु पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नव्हते. सध्या मका कापणी व काढणीचा हंगाम असल्याने अचानक पाऊस झाल्याने शेतात कापून ठेवलेला मका भिजू नये म्हणून शेतकºयांची धावपळ झाली. काढणीस आलेला लाल कांदा या पावसामुळे खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वणीपरिसरात रविवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे फटाके विक्र त्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.देवळातालुुक्यात भीषण दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी चिंतित असताना रविवारी सायंकाळी देवळा शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, मका भिजला आहे. सध्या पोळ कांदा काढणीचे काम सुरू आहे. कांदा काढल्यानंतर अनेक शेतकरी शेतातच कांद्याच्या पोळ घालतात. अचानक आलेल्या पावसामुळे हा कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच धावपळ उडाली. शेतात काढलेली मक्याची कणसे व चारा अचानक आलेल्या पावसामुळे भिजला आहे.मालेगावमालेगावसह परिसरात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वच शहर जलमय होवून गेले. तालुक्यातील चिंचवे गा. येथील पांडूरंग केशव सावळे या शेतकºयाची म्हैस वीज पडून ठार झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हातातून गेले असून कमी प्रमाणात रब्बी पेरणी झाली आहे. शहरातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे तळे साचले.सोनजांब परिसरात गारांसह वादळी पाऊसखेडगाव : परिसरात गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षेसह धान्य पिकांचे व टमाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच भाजीपाल्याला भाव नाही. त्यात बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच सुमारास वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. सलग दोन ते तीन तास पाऊस झाला. सुरुवातीला सोनजांब परिसरात चार ते पाच मिनिटे गारपीट झाल्याचे तेथील शेतकरी वर्गाने सांगितले. आता या पावसाचा परिणाम द्राक्षबागेवर दिसेल. मागच्या वर्षीच्या बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही द्राक्ष उत्पादक शेतकºयांना काहीच मदत मिळालेली नाही. आता परत झालेले हे नुकसान त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बाजारपेठेत अजूनही दीपावलीच्या खरेदीची फारशी धावपळ दिसून येत नसल्याने व्यापारी वर्ग भरलेला माल विकला जाईल की नाही या चिंतेत असताना अवकाळी पावसाने त्यांची चिंता वाढवली आहे. महसूल विभागाने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, आशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी