शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

मटाणे परिसरात पावसाने पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:33 AM

मेशी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील मटाणे, वरवंडी आदी गावांमधील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

ठळक मुद्दे. भाजीपाला, कांदा पूर्णपणे खराब झाला

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील मटाणे, वरवंडी आदी गावांमधील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत.यात उभे असलेले मका, भुईमूग, तूर, कांदा आदी पिके पाण्यात असल्याने काळी पडून सडू लागली आहेत. याशिवाय सोंगणी केलेल्या बाजरीचे कणीस शेतातच ढीग करून पडले असल्याने त्यावरून कापड टाकलेली झाकून ठेवल्यामुळे काळी कणसे होऊन अंकुर फुटलेत त्यामुळे बाजरीची पिके गेलीत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता त्यामुळे दुष्काळी दुष्टचक्र सोसत असलेला शेतकरी राजास यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे. भाजीपाला, कांदा पूर्णपणे खराब झाला आहे.कांदा उपटताना कांदा जमिनीत राहतो आणि फक्त पातच हातात येते. कांदे पूर्णपणे जमिनीतच सडला आहे. गुरुवारी रात्रभर झालेल्या पावसाने शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले आहे. त्यामुळे जमीन खराब झाली आहे. डाळिंबबागा मर रोगामुळे नेस्तनाबूत होत आहे. सर्व शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मायबाप शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी