शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 00:52 IST

जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण, येवला तालुका परिसरात शुक्रवारी (दि. २८) साडेचार वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसाने काही भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूककोंडी बघायला मिळाली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्याही घटना घडल्या. आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली. 

ठळक मुद्देरोहिणी बरसले : काही भागात वृक्ष कोसळलेवाहतुकीची कोंडी; वीजपुरवठा खंडित; शेती, पिकांचे नुकसान

नाशिक : जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण, येवला तालुका परिसरात शुक्रवारी (दि. २८) साडेचार वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसाने काही भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूककोंडी बघायला मिळाली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्याही घटना घडल्या. आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली. पाटोद्यात तडाखापाटोदा : पाटोदा परिसरातील ठाणगाव पिंपरी, कानडी, विखरणी, आडगाव रेपाल, मुरमी, विसापूर कातरणी या गावात शुक्रवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन उकाडा वाढला होता.   पाऊस जोरात असल्याने अगदी काही वेळातच शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.  पावसामुळे शेतात पोळी लावून ठेवलेला कांदा तसेच खळ्यावर असलेला जनावरांचा चारा तसेच चाऱ्याची कुटी झाकण्यासाठी शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली.  काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर शेताच्या बांधावर असलेल्या गावरान आंब्यालाही मोठा फटका बसला आहे. कांदा बियाणांसाठी असलेल्या डोंगळा पिकालाही याचा फटका बसला आहे.साकोरेत रस्ता बंदकळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर झाड पडल्यामुळे कळवण व नाशिक रस्त्यावर  दुतर्फा वाहने अडकून पडली.  रस्ता बंद असल्यामुळे पोकलॅन्डच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात साकोरे ग्रामस्थांना यश आले. कळवण शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते.  दुपारी पावणेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.  शहरातील अनेक सकल भागांत पाणी साचले. शहरातील  मेन रोड रस्त्याचे काम सध्या संथगतीने चालू आहे. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदकाम, गटार खोदकाम केलेले आहे. तेथे  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.शेमळीत वीजपुरवठा खंडित जुनी शेमळी : येथील परिसरात सायंकाळी  तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे गावातील श्रीराम मंदिरासमोरील वृक्ष उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांबावरील तारा तुटल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. बाहेर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.  तत्काळ  महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. आंब्याचीही मोठ्या प्रमाणात  गळती झाली. वादळी वाऱ्यामुळे सटाणा, मालेगाव रस्त्यावरही वृक्ष उन्मळून पडले.  निफाड, देवळ्यात हजेरी निफाड : निफाड व परिसरात  शुक्रवारी (दि.२८) दुपारी मध्यम स्वरूपाच्या  पावसाने हजेरी  लावली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चांदोरी येथील खरात पेट्रोलियमजवळ  महामार्गावर झाड कोसळले. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक खोळंबली होती.पिंपळगाव वाखारीत पाऊस पिंपळगाव वाखारी : पिंपळगाव वाखारी परिसरात रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतात साठवलेला कांदा व चाऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागतीसाठी होणार आहे. पावसामुळे परिसरात शेतकामांना वेग येणार आहे.रिक्षावर झाड पडल्याने दाम्पत्य जखमीमालेगाव मध्य : शहरातील  बापू गांधी कपडा बाजार, अय्युबनगर भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. नागरिकांनी स्वतः  गटारींची सफाई केल्याने पाण्याचा निचरा झाला. याच भागात झाड उन्मळून पडल्याने एका प्रवासी रिक्षासह दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने रिक्षात बसलेल्या दाम्पत्याला किरकोळ दुखापत झाली. विजेच्या खांबावर झाड पडल्याने खांब वाकला आहे. विजेच्या तारा तुटल्याने परिसरात अंधार पसरला आहे. शहरातील अनेक भागात स्वच्छतेअभावी गटारी तुडुंब भरल्याने अनेक भागात पाणी साचले होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारींसह मुख्य नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस