शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी आरोग्य नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

नाशिक- शहरात कडक निर्बंध लागू करताना भाजीपाल्यास परवानगी देण्यात आली खरी मात्र, असे करताना त्यासाठी आरोग्य नियमांचे पालन करणे ...

नाशिक- शहरात कडक निर्बंध लागू करताना भाजीपाल्यास परवानगी देण्यात आली खरी मात्र, असे करताना त्यासाठी आरोग्य नियमांचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले; परंतु ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर भाजी बाजार असताना त्याठिकाणी सॅनिटायझर ना मास्क किंबहुना सुरक्षित एक मीटर अंतराचे पालनदेखील केले जात नसल्याचे आढळले आहे. नाशिक शहरात कोरोना वाढत असताना गेल्या ५ एप्रिलपासूनच शहरात निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, त्याचे फारसे पालन होताना दिसत नव्हते. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यावेळी देखील तीच स्थिती कायम राहिली. वास्तविक कोरोनाकाळात भाजी बाजार कसे असावेत तेथे कोणत्या नियमांचे पालन हवेत याबाबत गेल्यावर्षीच नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजीविक्रेत्यांकडे मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज बंधनकारक आहे शिवाय दुकानासमोर किमान एक मीटर अंतरावर ग्राहक राहील याबाबत देखील नियम करण्यात आला आहे. गेल्यावर्षी फिजीकल डिस्टन्सिंगसाठी दुकानांसमोर चाैकाेन आणि वर्तुळही तयार करण्यात आले. मात्र, कोराेनाबाधितांचा आकडा कमी होताच सर्व नियम बाजूला सारले गेले आता १२ ते २३ मेदरम्यान कडक लॉकडाऊन असताना शहरात सात बारावाजेपर्यंतच भाजी बाजार आहे. त्यावेळी नियम पालनाची सक्ती असली तरी प्रत्यक्षात ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये आढळली नाही.

इन्फो...

काय आढळले रियॅलिटी चेकमध्ये

१ महापालिकेने आखणी न करून दिलेल्या ठिकाणीदेखील भाजी बाजार भरत आहे. मात्र, त्याठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन आढळले नाही.

२ सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला, नागरिक गर्दी करून खरेदी करत होते.

३ मास्कचा वापर जेमतेम होता, बोलताना अनेकजण मास्क बाजूला करून बोलत होते.

४ सॅनिटायझर काही दुकानदारांकडे व्यक्तिगत वापरासाठी होते.

५ सुरक्षित अंतराचे पालन नाही तसेच ग्लोजदेखील वापरण्यात येत नव्हते.

इन्फो..

जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंधाबाबत काढलेल्या आदेशात महापालिकेने भाजी बाजाराची आखणी करावी असे जाहीर केले होते. मात्र, नवीन आखणी केल्याचे आणि ते जाहीर केल्याचे आढळले नाही. त्याच प्रमाणे कर्मचारी नियुक्त करून आरोग्य नियमांचे पालक होते किंवा नाही हे तपासण्यास सांगितले होते. मात्र, अनेक बाजारांमध्ये कर्मचारीच नियुक्त नव्हते मग नियमांचे पालन होत नाही म्हणून बाजार दहा दिवस बंद कसा ठेवणार, असाही प्रश्न निर्माण झाला.