शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात

By suyog.joshi | Updated: October 20, 2023 14:55 IST

ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार

नाशिक (सुयोग जाेशी) : स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रजांची देवभूमी आता ड्रग्जमाफियांची भूमी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नशेत बुडाला असून आजचा मोर्चा म्हणजे नाशिककरांसाठी लढाई असल्याचे सांगत नाशिकच्या पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का? असा घणाघात शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शुक्रवारी ड्रग्जविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना राऊत यांनी शिष्टमंडळासह निवेदन दिले. मोर्चात मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चात ‘पालकमंत्री वाचवा, अंमली पदार्थ बंद करा, पालकमंत्री हटाव, नाशिक बचाव’ घोषणा देत वातावरण दुमदुमून सोडले. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, शिवसेना नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरली आहे. नाशिकला ड्रग्जमाफिया बनविणाऱ्या सरकारविरोधात आमचा आक्रोश असून इकडे आमचा मोर्चा सुरू असताना तिकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत पत्रकार परिषद घेत आहेत. वास्तविक पाहता फडणवीस यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. परंतु ते तेथे पत्रकार परिषद घेत बसले. ड्रग्जप्रकणी सरकार गांभिर्याने विचार करत नाही. ताेपर्यंत सरकारला आम्ही सोडणार नाही असा इशारा देत राऊत म्हणाले, ड्रग्जप्रकरणात गृहमंत्री, पालकमंत्री राजकारण करत आहे. ड्रग्जप्रकरणात कोणाला किती खोके दिले जातात याचा सर्व हिशोब पालकमंत्र्यांना माहिती आहे. पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का असा प्रश्न विचारत या मालेगावच्या कुत्ता गोळीचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा राऊत यांनी दिला.

उद्धव, आदित्य ठाकरे यांचा फाेनसकाळी शिवसेना नेते उद्वव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोन येऊन गेला. ते म्हणाले, आपल्याला नाशिक वाचवायचे आहे. ही लढाईची सुरूवात आहे. त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. आपल्याला ड्रग्जविरोधात लढा द्यायचा आहे. त्यामुळे ही निकराची लढाई लढण्यासाठी प्रत्येकाने तयार राहावे असे आवाहनही त्यांनी केले.मोठ्या भाभीला १५ लाखांचा हप्ताछोट्या भाभीला अटक केली. मग १५ लाखांचा हप्ता घेणाऱ्या मोठ्या भाभीचे काय? असा प्रश्न विचारत राऊत यांनी ड्रग्जच्या व्यापारातून किती खोके मंत्र्यांना दिली जातात याचा तपास करा. नाशिकची तरूणपिढी या ड्रग्जपायी वाया जात असून ड्रग्जमाफियांकडून नाशिक शहराचा नाश होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतDrugsअमली पदार्थ