शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट का कापले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:53 IST

सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.

नाशिक : सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.माकपाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवून बाजी मारली. त्यामुळे चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपाला आदिवासी क्षेत्रात विस्तार करण्याची संधी दिसत होती. चव्हाण यांनी अपेक्षेनुरूप लोकसभेत यश मिळविले. परंतु चव्हाण यांना पक्षाला न्याय देऊ शकले नाही. भाजपाने संघटनात्मक वाढीचा कार्यक्रम आखला. परंतु चव्हाण यांचा सक्रिय सहभाग यथातथाच राहिल्याचे सांगितले जाते. दिंडोरी मतदारसंघातील विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फायदा करून देण्यापेक्षा अलिप्तताच स्वीकारली. पक्षाने त्यांना अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, तर त्यांचे चिरंजीव इंद्रजित यांना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वांकाक्षी सीएम चषकसाठी पालकमंत्र्यांनी सूचित करूनही त्यांनी वेळ दिला नाही.तीनवेळा निवडून आल्यानंतर प्रस्थापितांच्या विरोधातील जनमताचा फटका त्यांना बसण्याची शक्यता भाजपाच्या सर्वेक्षणात दिसली. त्यातच आदिवासी विभागातील भरती प्रकरण किंवा सुरगाण्यातील शासकीय समित्यांवर अशासकीय नियुक्ती असो सत्तेच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिकादेखील पक्षाला खटकली होती. त्याचा परिणाम उमेदवारी देताना दिसून आला.भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात अ‍ॅण्टी इन्कमबन्सीचा फॅक्टर आढळल्याचे सांगितले जाते. तीन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाण यांना जनमत अनुकूल नव्हते, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टीच्या संघटना विस्तारात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची तटस्थता कारणीभूत ठरली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची सत्ता यावी यासाठी पुढाकार घेऊन काम केले नसल्याचे एक कारण सांगितले जाते.पक्षाची सत्ता असताना आदिवासी विभागातील कथित गैरव्यवहाराबाबत चर्चा करून पक्षाला अडचणीत आणण्याची घेतलेली भूमिकाही अडचणीत आणणारी ठरली.काय होऊ शकते?विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणे सोपे असले तरी लोकसभा निवडणुकीत ते शक्य नाही. खुद्द हरिश्चंद्र चव्हाण यांना त्याची जाणीव असल्याने ते नाराज असले तरी बंडखोरी करण्याची शक्यता कमी आहे. परंतु निवडणुकीत ते तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. अनेक पक्ष निमंत्रित करीत असल्याचा त्यांचा दावा असला तरी निवडणूक लढविण्याची शक्यता नाही.खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार नसले तरी निवडणूक आपल्याभोवती फिरवण्याचा प्रयत्न करतील. आपली भूमिका निर्णायक असल्याचे वातावरण निर्माण करतील. पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे सांगून सहानुभूती मिळवतील.

टॅग्स :Harishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणElectionनिवडणूकBJPभाजपा