शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट का कापले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:53 IST

सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.

नाशिक : सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.माकपाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवून बाजी मारली. त्यामुळे चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपाला आदिवासी क्षेत्रात विस्तार करण्याची संधी दिसत होती. चव्हाण यांनी अपेक्षेनुरूप लोकसभेत यश मिळविले. परंतु चव्हाण यांना पक्षाला न्याय देऊ शकले नाही. भाजपाने संघटनात्मक वाढीचा कार्यक्रम आखला. परंतु चव्हाण यांचा सक्रिय सहभाग यथातथाच राहिल्याचे सांगितले जाते. दिंडोरी मतदारसंघातील विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फायदा करून देण्यापेक्षा अलिप्तताच स्वीकारली. पक्षाने त्यांना अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, तर त्यांचे चिरंजीव इंद्रजित यांना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वांकाक्षी सीएम चषकसाठी पालकमंत्र्यांनी सूचित करूनही त्यांनी वेळ दिला नाही.तीनवेळा निवडून आल्यानंतर प्रस्थापितांच्या विरोधातील जनमताचा फटका त्यांना बसण्याची शक्यता भाजपाच्या सर्वेक्षणात दिसली. त्यातच आदिवासी विभागातील भरती प्रकरण किंवा सुरगाण्यातील शासकीय समित्यांवर अशासकीय नियुक्ती असो सत्तेच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिकादेखील पक्षाला खटकली होती. त्याचा परिणाम उमेदवारी देताना दिसून आला.भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात अ‍ॅण्टी इन्कमबन्सीचा फॅक्टर आढळल्याचे सांगितले जाते. तीन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाण यांना जनमत अनुकूल नव्हते, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टीच्या संघटना विस्तारात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची तटस्थता कारणीभूत ठरली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची सत्ता यावी यासाठी पुढाकार घेऊन काम केले नसल्याचे एक कारण सांगितले जाते.पक्षाची सत्ता असताना आदिवासी विभागातील कथित गैरव्यवहाराबाबत चर्चा करून पक्षाला अडचणीत आणण्याची घेतलेली भूमिकाही अडचणीत आणणारी ठरली.काय होऊ शकते?विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणे सोपे असले तरी लोकसभा निवडणुकीत ते शक्य नाही. खुद्द हरिश्चंद्र चव्हाण यांना त्याची जाणीव असल्याने ते नाराज असले तरी बंडखोरी करण्याची शक्यता कमी आहे. परंतु निवडणुकीत ते तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. अनेक पक्ष निमंत्रित करीत असल्याचा त्यांचा दावा असला तरी निवडणूक लढविण्याची शक्यता नाही.खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार नसले तरी निवडणूक आपल्याभोवती फिरवण्याचा प्रयत्न करतील. आपली भूमिका निर्णायक असल्याचे वातावरण निर्माण करतील. पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे सांगून सहानुभूती मिळवतील.

टॅग्स :Harishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणElectionनिवडणूकBJPभाजपा