शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

हरणबारी ,केळझर मधून रब्बीसाठी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 4:49 PM

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्यात आली .बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी ,उपअभियंता ई.बी.शेवाळे ,उपअभियंता अभिजित रौंदळ,शाखा अभियंता आर.बी.सूर्

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार१८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते .यंदा या रब्बी हंगामासाठी शेतकº्यांनी पाण्याच्या तीन आवर्तनाची मागणी केली होती .मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले .शेतकर्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून२५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे .उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे .दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी .तसेच रब्बी पिकासाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकº्याच्या शेत पर्यंत कसे पोहचेल यासाठी नियोजन करावे .जेणेकरून पेरा केले पिक हातात येईल अशा सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .बैठकीस आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदाबापू काकुळते ,बाळासाहेब भदाणे ,पांडुरंग सोनवणे ,माधवराव सोनवणे ,जनार्दन सोनवणे ,भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते .असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा ...हरणबारी धरण पाणी साठा ११६६ दशलक्ष घनफूट ,पैकी बाष्पीभवन तुट ११७ दशलक्ष घनफूट ,पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट ,रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे .पैकी बाष्पीभवन तुट ८६ दशलक्ष घनफूट ,पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे . ३८५दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरिक्षत करण्यात आले आहे .