शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

थांबले असते ना बाळासाहेब ! 

By श्याम बागुल | Updated: November 2, 2019 18:08 IST

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू लागला आहे.

ठळक मुद्देसानप भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हायले असताना त्यांचा सेनेतील प्रवेश मुख्यमंत्र्यांना चालणार कासानप यांचा भ्रष्टाचार ते खपवून घेणार काय?

श्याम बागुलनाशिक : ‘पाच वर्षे सर्व पदे दिली, अपेक्षा हीच होती की, सेवक म्हणून बाळासाहेब सानप हे काम करतील. परंतु त्यांना पक्षाच्या संस्कृतीचा विसर पडला आणि ते भ्रष्टाचाराच्या गंगेत आंघोळ करणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही’ असा इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभूत झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत सानप यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या वळचणीला जावे या दोन्ही घटनांचा अर्थाअर्थी काही तरी संबंध असण्याला वाव आहे. आता प्रश्न एवढाच आहे की सानप भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हायले असताना त्यांचा सेनेतील प्रवेश मुख्यमंत्र्यांना चालणार का आणि सानप यांचा भ्रष्टाचार ते खपवून घेणार काय?

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू लागला आहे. गंगेच्या काठावर उभे राहून बाळासाहेब सानप यांच्याविषयी भ्रष्टाचाराचे बोल खुद्द मुख्यमंत्र्यांनी लावल्यानंतर सानप यांची भाजपाने उमेदवारी का कापली यामागचे गुपीत उघड झाले. पार्टी विथ डिफरन्समध्ये गेल्या तीस वर्षांपासून असलेले सानप भ्रष्टाचाराच्या गंगेत आकंठ बुडाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगावे व त्याची साधी भनक नाशिककरांना लागू नये? उलटपक्षी त्याच बाळासाहेब सानपांवर भ्रष्टाचारी असताना भाजपाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लादून त्यांच्या अगोदरच्या वजनापेक्षा अधिक भार तरी का द्यावा याचे उत्तर मात्र मुख्यमंत्री आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात देऊ शकले नाहीत. सानप यांच्या मतदारसंघातच त्यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे साहजिकच सानप यांच्याकडून पलटवार होणे स्वाभाविक होते, ‘इतकी वर्षे पक्षाचे काम केले तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही का’ असा उलट सवाल सानप यांनी केल्यावर त्याला मात्र कोणी प्रत्युत्तर केले नाही. त्यामुळे सानप हे मुख्यमंत्र्यांच्या धमकीला न घाबरता विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या लढावू बाण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कौतुक केले. एवढेच नव्हे तर सानप यांचा भाजपातील ३० वर्षांतील संघटन कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी त्यांच्यावर राष्टÑवादीची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे सूतोवाचही सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सानप यांच्या भ्रष्टाचारावर जणूकाही राष्ट्रवादीने पांघरूण घातले असताना दुसºयाच दिवशी सानप यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून सेनेचे शिवबंधन हातात बांधले. आता प्रश्न असा निर्माण होतो, राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी दिली व भाजप-सेनेने मिळून त्यांचा पराभव केला असताना सानप सेनेच्या वळचणीला का गेले हे स्पष्ट होऊ शकले नाही. कुठल्या तरी कार्यक्रमात सानप यांनी आपले राष्ट्रवादीत मन रमू शकले नाही, हिंदुत्ववादी विचाराशीच आपले जुळू शकते म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. आता सानप यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेला असून, आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे व शिवसेनेचे त्यांना समर्थन राहील हेदेखील तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष सेनेत भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हालेले सानप मुख्यमंत्र्यांना चालतील काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सानप यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही ही नाशिककरांच्या साक्षीने केलेली घोषणा शब्दाला पक्के असलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात आणलीच तर बचावाला सत्तेतील पक्षच हवा, अशा हेतूने तर सानप यांनी शिवसेना प्रवेश केला नसावा? अर्थात राजकारणात कधीही काहीही होऊ शकते तसे कोणी कधीच कोणाचा कायमचा मित्र व शत्रूही नसतो त्यामुळे संभाव्य कारवाईच्या भीतीने बाळासाहेब सानप यांनी पक्षांतर करण्याची केलेली घाई जरा अतीच म्हणावी लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाShiv Senaशिवसेना