शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

गुरुकुल शिक्षणाला प्राधान्य द्यावे : मुकुल कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:34 IST

शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देशतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोपशिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही

नाशिक : शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतकमहोत्सवनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित शतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोप कार्यक्र माप्रसंगी मुकुल कानिटकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या शतकमहोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष महेश दाबक, सेक्रे टरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, सदस्य शोभना भिडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.  शिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज पसरविला आहे, मात्र शिक्षणाने प्रतिष्ठा मिळते. परीक्षेमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. परीक्षा ही स्मरणशक्तीची घेतली जाते. याचा फायदा ठराविक विद्यार्थ्यांनाच होतो. गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही. संस्कार हे शालेय शिक्षणातून मिळत नाही. वर्गात मुले घडत नाहीत. शैक्षणिक वातावरण तयार केले गेले पाहिजे, असेही यावेळी कानिटकर म्हणाले.सूत्रसंचालन प्रा. करु णा कुशारे तर आभार सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. प्रास्ताविक शोभना भिडे यांनी केले. यावेळी जयंत मोंढे, संजय परांजपे,  वसंत जोशी, डॉ. सारंग इंगळे, डॉ. भारद्वाज, मुंबई येथील व्यवसाय शिक्षण विभागाचे उपसंचालक वाकडे, मिलिंद कचोळे, प्रवीण बुरकुले, मधुकर जगताप यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य उपस्थित होते. चर्चासत्रात सहभाग डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्थेने राबविलेल्या शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वेध भविष्याचा, स्वायत्तता काळाची गरज या विषयावरील चर्चासत्रात दिलीप टिकले, दिलीप पेठे, शरद कुंटे, महेश दाबक, श्रीरंग देशपांडे, रवींद्र वंजारवाडकर, डॉ. सुनील कुटे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक