शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

गुरुकुल शिक्षणाला प्राधान्य द्यावे : मुकुल कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:34 IST

शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देशतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोपशिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही

नाशिक : शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतकमहोत्सवनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित शतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोप कार्यक्र माप्रसंगी मुकुल कानिटकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या शतकमहोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष महेश दाबक, सेक्रे टरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, सदस्य शोभना भिडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.  शिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज पसरविला आहे, मात्र शिक्षणाने प्रतिष्ठा मिळते. परीक्षेमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. परीक्षा ही स्मरणशक्तीची घेतली जाते. याचा फायदा ठराविक विद्यार्थ्यांनाच होतो. गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही. संस्कार हे शालेय शिक्षणातून मिळत नाही. वर्गात मुले घडत नाहीत. शैक्षणिक वातावरण तयार केले गेले पाहिजे, असेही यावेळी कानिटकर म्हणाले.सूत्रसंचालन प्रा. करु णा कुशारे तर आभार सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. प्रास्ताविक शोभना भिडे यांनी केले. यावेळी जयंत मोंढे, संजय परांजपे,  वसंत जोशी, डॉ. सारंग इंगळे, डॉ. भारद्वाज, मुंबई येथील व्यवसाय शिक्षण विभागाचे उपसंचालक वाकडे, मिलिंद कचोळे, प्रवीण बुरकुले, मधुकर जगताप यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य उपस्थित होते. चर्चासत्रात सहभाग डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्थेने राबविलेल्या शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वेध भविष्याचा, स्वायत्तता काळाची गरज या विषयावरील चर्चासत्रात दिलीप टिकले, दिलीप पेठे, शरद कुंटे, महेश दाबक, श्रीरंग देशपांडे, रवींद्र वंजारवाडकर, डॉ. सुनील कुटे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक