शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन १५ दिवस कायम ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:35 PM

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले.

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. तत्संबंधीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाजन हे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नाशिक दौºयावर आले असता भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेतली व निवेदन दिले.यावेळी महाजन यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. निवेदनात पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये निफाड व येवला या दोन्ही तालुक्यांंमध्ये जेमतेम १५५ मि. मि.पावसाची नोंद झाली आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके करपू लागली आहे. त्याचबरोबर द्राक्षबागा,पेरू, डाळिंंब या फळबागा संकटात आल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. यासर्व पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.सध्या पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्याचे सात दिवसाचे आवर्तन सुरु आहे. तेच आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरू ठेवावे अशा मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे.या शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाघ, निफाड पंंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती विलास गोरे, निलेश सालकाडे, सोपान दरेकर, भारत कानडे,अमोल निकम, अरविंद पाटील, विलास पाटील आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nashikनाशिक