शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

यंदा जिल्ह्यात वाढणार द्राक्षांची गोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:25 IST

सायखेडा : निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये नाशिकच्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यात होणाऱ्या द्राक्षांची आणि देशांतर्गत ...

सायखेडा : निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये नाशिकच्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यात होणाऱ्या द्राक्षांची आणि देशांतर्गत बाजारपेठेतील द्राक्षांसाठी रेप नेट ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी केली जाते. ३० नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील २६ हजार २०७ हेक्टरी द्राक्षबाग भागाची राज्यातील सर्वाधिक नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा देशाच्या तुलनेत नाशिकची सर्वाधिक द्राक्ष आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये जाणार असल्याने नाशिकच्या द्राक्षांची गोडी वाढणार असल्याची माहिती तांत्रिक विभागाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात शेतीसंदर्भातील अर्थकारणात सर्वात मोठी उलाढाल द्राक्ष पिकात होत असते. जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, बागलाण, सिन्नर व येवला तालुक्यातील काही भाग या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाचे पीक घेतले जाते. द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सर्वाधिक लागवड असून, त्याखालोखाल दिंडोरी आणि नाशिक तालुक्याचा क्रमांक लागतो. शेती उत्पादनातील सर्वात महागडे आणि जिकिरीचे पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते. एक वर्षाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी किमान दोन लाख रुपये खर्च येतो. वर्षाला इतका खर्च करूनदेखील अवकाळी पाऊस तर कधी गारपीट या वातावरणाचा परिणाम होत असल्याने अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदादेखील द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच मोठा संकटांचा सामना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अवकाळी आणि बेमोसमी पावसाने थैमान घातले असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष पिकाची नोंदणी झाल्याने कृषी विभागाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

अर्ली द्राक्षांचे नुकसान

ऑगस्ट महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागांना अवकाळी आणि बेमोसमी पावसाने झोडपले. गळ आणि कूज समस्या मोठ्या प्रमाणात आल्याने हंगामाच्या सुरुवातीला छाटणी झालेल्या द्राक्षबागा बहुतांशी भागांमध्ये वाया गेली आहेत. जवळपास २५ टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने सुरुवातीपासून द्राक्षांना चांगले बाजारभाव राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, स्थानिकसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना चांगली मागणी असणार आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. यंदा सरकारी धोरण आणि अडथळे आले नाहीत तर शेतकऱ्यांना चार पैसे चांगले मिळतील.

- डॉ. वसंत ढिकले

अध्यक्ष, द्राक्ष विज्ञान मंडळ