अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:15 AM2020-12-15T00:15:00+5:302020-12-15T01:10:17+5:30

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे.

Grape growers worried about untimely rains | अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल

अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल

Next
ठळक मुद्देयेवला : कांदा लागवड दाट धुक्याच्या कचाट्यात

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप , जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहेत; मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवडदेखील ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याच्या कचाट्यात सापडली आहे. कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णतः धास्तावला आहे. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्ष बागेला काही दिवसांपूर्वी चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत; मात्र तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष फळांवर पाणी साचून काळे डाग पडत आहेत. वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते; मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे उत्पादकांकडून सांगितले जात आहे.

तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. पुढचे काही दिवस वातावरण असेच ढगाळ राहिल्यास द्राक्ष बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागेल.
- कल्याण कोटकर, द्राक्ष उत्पादक, शिरसगाव लौकी.

Web Title: Grape growers worried about untimely rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.