शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

दिंडोरीतील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:13 IST

निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाउन : शासनाकडून उपाययोजनेची मागणी

लखमापूर : निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.द्राक्षपंढरीवर वारंवार येत असलेल्या निसर्गाच्या कोपाने व अस्मानी व सुलतानी संकटाने निसर्गाच्या दुष्टचक्रापुढे द्राक्षपंढरी हतबल झाली असून, द्राक्ष शेती करणे दिवसेंदिवस अवघड व जिकिरीचे बनत चालले आहे. परकीय व नगदी चलन मिळवून देण्याच्या चवीने जागतिक बाजारपेठ काबीज केलेल्या जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या खर्चिक व महागड्या द्राक्ष पिकाला अवकळा आली आहे. द्राक्ष पिकांबरोबर इतर पिके घेणारा शेतकरी लॉकडाउनमुळे कचाट्यात सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जनजीवन ठप्पझाले असून, दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनामुळे द्राक्ष विक्री व्यवसाय बंद झाल्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतातच द्राक्ष असून, शेतकरी चिंतित आहेत. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, परमोरी, दहेगाव, वागळूद, ओझे, करंजवण,ओझरखेड, पुणेगाव, दहिवी, कोशिंबे, अवनखेड, कादवा म्हाळुंगी, म्हेळुस्के ही गावे द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर आहेत; परंतु सद्यस्थितीला या गावातील द्राक्षबागा विक्र ीअभावी उभ्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण देशात लॉकडाउन केल्यामुळे व शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे या मालाची विल्हेवाट लावायची कशी? या विवंचनेत द्राक्ष उत्पादक सापडले आहेत.स्थानिक व्यापारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्यासारख्या मालाला कवडीमोल दराने देऊन जे पदरी पडेल त्या भावाने द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष माल द्यायला तयार असून, द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करून माल खरेदी करून बाहेर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र द्राक्षमालाच्या गाड्या अडविल्या जातात. त्यामुळे द्राक्ष व्यापाºयांनी द्राक्ष काढणी बंद केली आहे. या सर्वच गोष्टींमुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून, बळीराजाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या संकटातून बळीराजा कसा बाहेर येईल यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना आणून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा ही मागणी जोर धरीत आहे.माल विकला गेला तरच चार पैसे हाती लागतील व आपल्यावर असलेल्या सोसायटी, बँक, पतसंस्था व अन्य ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडता येईल. तसेच घरात मंगल कार्य अथवा देणे-घेणे करता येईल या भरवशावर आज ना उद्या यातून मार्ग मिळेल, शासन आपल्याला मदत करेल याची या शाश्वती असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शासन यावर काय निर्णय घेते याचीच वाट बघत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार