शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

दिंडोरीतील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:13 IST

निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाउन : शासनाकडून उपाययोजनेची मागणी

लखमापूर : निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.द्राक्षपंढरीवर वारंवार येत असलेल्या निसर्गाच्या कोपाने व अस्मानी व सुलतानी संकटाने निसर्गाच्या दुष्टचक्रापुढे द्राक्षपंढरी हतबल झाली असून, द्राक्ष शेती करणे दिवसेंदिवस अवघड व जिकिरीचे बनत चालले आहे. परकीय व नगदी चलन मिळवून देण्याच्या चवीने जागतिक बाजारपेठ काबीज केलेल्या जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या खर्चिक व महागड्या द्राक्ष पिकाला अवकळा आली आहे. द्राक्ष पिकांबरोबर इतर पिके घेणारा शेतकरी लॉकडाउनमुळे कचाट्यात सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जनजीवन ठप्पझाले असून, दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनामुळे द्राक्ष विक्री व्यवसाय बंद झाल्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतातच द्राक्ष असून, शेतकरी चिंतित आहेत. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, परमोरी, दहेगाव, वागळूद, ओझे, करंजवण,ओझरखेड, पुणेगाव, दहिवी, कोशिंबे, अवनखेड, कादवा म्हाळुंगी, म्हेळुस्के ही गावे द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर आहेत; परंतु सद्यस्थितीला या गावातील द्राक्षबागा विक्र ीअभावी उभ्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण देशात लॉकडाउन केल्यामुळे व शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे या मालाची विल्हेवाट लावायची कशी? या विवंचनेत द्राक्ष उत्पादक सापडले आहेत.स्थानिक व्यापारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्यासारख्या मालाला कवडीमोल दराने देऊन जे पदरी पडेल त्या भावाने द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष माल द्यायला तयार असून, द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करून माल खरेदी करून बाहेर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र द्राक्षमालाच्या गाड्या अडविल्या जातात. त्यामुळे द्राक्ष व्यापाºयांनी द्राक्ष काढणी बंद केली आहे. या सर्वच गोष्टींमुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून, बळीराजाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या संकटातून बळीराजा कसा बाहेर येईल यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना आणून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा ही मागणी जोर धरीत आहे.माल विकला गेला तरच चार पैसे हाती लागतील व आपल्यावर असलेल्या सोसायटी, बँक, पतसंस्था व अन्य ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडता येईल. तसेच घरात मंगल कार्य अथवा देणे-घेणे करता येईल या भरवशावर आज ना उद्या यातून मार्ग मिळेल, शासन आपल्याला मदत करेल याची या शाश्वती असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शासन यावर काय निर्णय घेते याचीच वाट बघत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार