शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सरकारी आकडेवारीत कुपोषणाची सत्यता लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:32 AM

सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.

ठळक मुद्देआशिष सातव : वसंत पवार स्मृती पुरस्काराने सातव दाम्पत्याचा सन्मान

नाशिक : सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे गुरुवारी (दि.११) योगदान सोहळ्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव दाम्पत्याचा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार २०१८’ प्रदान करून सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजीमंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमा पवार, सचिव डॉ. सुनील ढिकले, शशिकांत जाधव, वसंत खैरनार आदी उपस्थित होते.डॉ. आशिष सातव म्हणाले, आदिवासींसाठी प्रामाणिकपणे काम करताना अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्याचे काम काही राजकीय व शासकीय यंत्रणेतील व्यक्तींनी केले. एकीकडे आपण चंद्रावर जात असताना दुसरीक डे आदिवासींचे कुपोषण देशातील वास्तविकतेचे दर्शन घडवित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्चूनही भारतात कुपोषण निर्मूलन होत नाही. त्यामुळे महान संस्थेच्या माध्यमातून मेळघाटातील उपोषण आणि त्याची वास्तविकता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मांडल्याने २००५ मध्ये राजमाता जिजाऊ मशीनच्या माध्यमातून आदिवासींचे कुपोषण सर्वेक्षण होऊन सर्व आदिवासी भाग कुपोषित जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अविनाश अहेर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश मंत्री यांनी केले. डॉ. प्राची पवार यांनी आभार मानले.रुग्णच आमचे देवस्थानमेळघाटातील वैद्यकीय सेवेच्या प्रवासाविषयी सांगताना महात्मा गांधीजी व विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जनसेवेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगतानाच आता रुग्ण हेच देवस्थान आणि रुग्णसेवा पूजा बनल्याचे डॉ. आशिष सातव म्हणाले. तर आदिवासींच्या जीवन अज्ञान, अंधश्रद्धेने व्यापून टाकलेले असल्याने तेथे रुग्णसेवा करणे आव्हानात्मक होते; परंतु जसजसे उपचार सुरू केले तसतसे त्यांच्याशी आत्मियतेचे नाते निर्माण झाल्याचे डॉ. कविता सातव यांनी सांगितले.प्रत्येकाने स्वत:ची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. सैनिकांप्रमाणेच त्यांना लढण्यासाठी बळ देणाºया घटकाचा गौरव होणे आवश्यक असते. योगदान सोहळ्यातून डॉ. सातव दाम्पत्याच्या माध्यमातून मेळघाटात महान संस्थेच्या रुग्णसेवेत योगदान देणाºयांचाही सन्मान असल्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकdoctorडॉक्टर