शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसाहती पडल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:15 IST

नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत.

नाशिक : नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत. केंद्रीय प्रेस कामगारांची घटलेली संख्या, पोलीस आणि शासकीय कार्यालयांचे झालेले विभाजन यामुळे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतींचा वापर कमी झाल्याने या वसाहतही ओस पडल्या आणि कालांतराने भुरट्या चोरट्यांनी बंद वसाहतींमधील दरवाजे, खिडक्यांची चोरी केल्याने या वसाहतींनी अवकळा आली आहे.नेहरूनगर आणि गांधीनगर येथे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारे छापखाने आहेत. गांधीनगर आणि नाशिकरोड येथे असलेल्या प्रेसमध्ये काम करणाºया कामगारांसाठी मोठी वसाहत उभारण्यात आली आहे. गांधीनगर येथे तीन ते चार हजार कर्मचारी राहू शकतील अशी शासकीय वसाहत आहे. नेहरूनगर येथे आठ ते दहा हजार कर्मचाºयांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकेल अशी शासकीय वसाहत अनेक वर्षांपासून आहेत. त्याचप्रमाणे महसूल कर्मचाºयांसाठी आणि पोलीस कर्मचाºयांसाठीदेखील नाशिकरोडमध्ये वसाहती उभी होती.नाशिकरोड परिसर हा कामगार वसाहतीचा परिसर म्हणून मानला जातो. तीन ठिकाणी असलेले केंद्र सरकारचे छापखाने, एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचाºयांसाठी असलेली वसाहत, रेल्वे कर्मचारी, साखर कारखाना, पोलीस वसाहत, महापालिका कर्मचाºयांसाठी असलेल्या शासकीय वसाहती असल्यामुळे कामगार वसाहत म्हणून नाशिकरोडची ओळख सांगितली जात होती. परंतु कालौघात ही ओळख आता मागे पडली आहे.केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी कपातीचे धोरण, कारखान्यांमध्ये कमी झालेले काम, नव्याने कामगार भरती न करण्याचे धोरण यामुळे शासकीय कार्यालयांमधील कर्मचाºयांची संख्या कमी झाल्याने शासकीय वसाहतींचा वापरही कमी झाला आहे.परिणाम म्हणून या वसाहती ओस पडल्याने शासकीय निवासस्थानांचा वापर कमी झाला. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने किरकोळ कर्मचारीच शासकीय वसाहतींमध्ये राहत असल्याने कमी कुटुंबांमध्ये विस्तीर्ण परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहण्याबाबत कर्मचाºयांचीही मानसिकता नसल्यामुळे शासकीय सदनिकेमध्ये राहाण्याबाबत फारसे कुणी उत्सुकही दिसत नाही.शासकीय वसाहतींची देखभाल दुरूस्ती होत नसल्याने अशा ठिकाणी राहणे कर्मचाºयांना त्रासदायक वाटत असल्यामुळे कर्मचाºयांनी वसाहतींकडे पाठ फिरविली आहे.देखभाल-दुरूस्तीचेकाम झाले खर्चिकशासकीय कर्मचाºयांच्या निवासाची सोय म्हणून कर्मचारी कल्याण उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाºयांना राहण्याची व्यवस्था केली जाते. मोठे उत्पादन, कर्मचाºयांची मोठी संख्या आणि शिफ्टमध्ये चालणारे काम यामुळे शासकीय क्वॉर्टरमध्ये अस्तित्वात आले. परंतु कर्मचारी कपात झाल्यापासून शासकीय वसाहतही ओस पडू लागल्या. वसाहतीमध्ये राहणाºयांची संख्या कमी होऊ लागल्याने देखभाल दुरूस्तीचा खर्चही वाढू लागला. रिकाम्या सदनिकांवर अशाप्रकारचा खर्च करणे आर्थिक तोट्याचे ठरू लागल्याने कर्मचाºयांअभीव ओसाड झालेल्या वसाहती लवकर लयास गेल्या. कुणी राहाणारच नसेल तर दुरूस्ती का करायची म्हणून या सदनिका पडून राहिल्या आणि त्यामुळे त्यांची अधिक दुरवस्था झाली.चोरीच्या घटनांमुळे अधिकच बकाल स्वरूपबंद पडलेल्या शासकीय वसाहतींमधील दरवाजे आणि खिडक्या चोरट्यांनी चोरून नेसल्याने इमारतीचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत. बांधकामामधील विटा, फरशादेखील चोरीस गेल्याने अशा इमारती दुरूस्ती करणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHomeघर